Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image राजकीय

पाणी टंचाईच्या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीचा धडक मोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई / प्रतिनिधी – महात्मा गांधी नगर, एमआयडीसी, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर सह झोपडपट्टी विभागातील रहिवाशाना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. या विरोधात नवी मुंबई विकास आघाडीच्या वतीने धडक मोर्चा नेरुळ बी वॉर्ड कार्यालयावर काढण्यात आला.

येथील महात्मा गांधी नगर,एमआयडीसी, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर, रमेश मेटल क्वारी येथे रहिवाशांना कित्येक वर्षापासून पाण्याची टंचाई भासत आहे. याबाबत संबंधीत सत्ताधारी माजी लोकप्रतीनिधीने कसल्याही प्रकारे पाण्याचे प्रश्न सोडवत नसल्याने नेरुळ बी विभाग महानगरपालिका कार्यालय नवी मुंबई येथे धडक मोर्चा काढण्यात आला.

यावेळी निवेदन सादर करण्यात आले असून यात गेले वर्षभर महात्मा गांधी नगर व रमेश मेटल क्वारी येथील रहिवाशी यांनी वारंवार अर्ज विनंत्या, निवेदने करूनही पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याचे सांगितले जाते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X