महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य ताज्या घडामोडी

निरंकारी भक्तांकडून देशभरात 30 हजार युनिट रक्तदान

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी –  प्रतिवर्षाप्रमाणे संत निरंकारी मिशन मार्फत 24 एप्रिल रोजी बाबा गुरबचनसिंहजी यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ मानव एकता दिवसाच्या प्रसंगी मिशन कडून देशभर रक्तदानाच्या एका प्रेरक श्रृंखलेचा शुभारंभ होतो. यावर्षी सुद्धा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन मार्फत पूर्ण भारतवर्षात सुमारे 500हून अधिक शाखांमध्ये भव्य रक्तदान शिबिरांची अखंड श्रृंखला आयोजित करण्यात आली. सम्पूर्ण भारतभर आयोजित रक्तदान श्रृंखलेअंतर्गत सुमारे 30 हजार  यूनिट रक्त संकलित करण्यात आले.

मानव एकता दिवसाचे औचित्य साधून मुंबई महानगर प्रदेशात ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये एकंदर 1258 युनिट रक्त संकलित केले गेले. त्यापैकी संत निरंकारी सत्संग भवन, चेंबूर येथे आयोजित रक्तदान शिबिरात 230 निरंकारी भक्तांनी रक्तदान केले ज्याचे संकलन संत निरंकारी रक्तपेढी, विले पार्ले मार्फत करण्यात आले. दूसरे शिबिर संत निरंकारी सत्संग भवन, ओसवाल नगरी, नालासोपारा येथे आयोजित करण्यात आले ज्यामध्ये 465 निरंकारी भक्तांनी रक्तदान केले. या शिबिरामध्ये नायर हॉस्पिटलने 175 यूनिट, जे.जे.हॉस्पिटलने ने 129 यूनिट तर जगजीवनराम हॉस्पिटलने 161 युनिट रक्त संकलित केले. तिसरे शिबिर ग्राम सेवालय, उंबरपाडा, सफाळे (पूर्व) येथे आयोजित केले होते ज्याठिकाणी के.ई.एम.हॉस्पिटलकडून 259 युनिट रक्त संकलित केले गेले. चौथे शिबिर संत निरंकारी सत्संग भवन, मोठा गाव, डोंबिवली येथे आयोजित करण्यात आले ज्यामध्ये 304 निरंकारी भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. याठिकाणी जे.जे.महानगर रक्तपेढीने रक्त संकलन केले.

हे महाअभियान केवळ रक्तदान नसून सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांचा करुणा, सेवा आणि एकत्वाचा संदेश जीवनात उतरविण्याचे सजीव माध्यम आहे जे आम्हाला शिकवते, की मानवता हाच सर्वोच्च धर्म होय. याच प्रेरणेने युक्त संत निरंकारी मिशन, सेवा आणि समर्पणाच्या पथावर निरंतर मानवतेचा मार्ग प्रशस्त करत आहे.  मानव एकता दिवसाच्या निमित्ताने मुंबई महानगर प्रदेशामध्ये सुमारे 60 ठिकाणी विशेष सत्संग समारोहांचे आयोजन करण्यात आले ज्या द्वारे बाबा गुरबचनसिंहजी व अन्य बलिदानी संतांच्या दिव्य जीवनातून प्रेरणा प्राप्त करण्यात आली.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »