महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजडेस्क शिक्षण

कल्याणच्या देवजीभाई हरिया विधी महाविद्यालयाला राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेची मान्यता

DESK MARATHI NEWS.
कल्याण/ प्रतिनिधी – कल्याण पश्चिमेतील शहाड येथील नामवंत देवजीभाई हरिया विधी महाविद्यालयास नुकतीच राष्ट्रीय मूल्यांकन , मान्यता परिषद (एन ए ए सी) यांची महत्त्वपूर्ण मान्यता प्राप्त झाली आहे. या घडामोडीमुळे शहाड परिसरातील तसेच आजूबाजूच्या भागातील विधी शिक्षण क्षेत्रात एक नवा विश्वास आणि उर्जित विकास निर्माण झाला आहे.नव्याने अधिवक्ता होण्याची संधी जवळ च उपलब्ध होणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूर्यकांत भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने मागील काही वर्षांत शिक्षणाची गुणवत्ता, संशोधन कार्य, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक सुविधा आणि अभ्यासक्रमातील आधुनिकतेच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. याच प्रयत्नांची दखल घेत राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेने ही मान्यता प्रदान केली आहे.
ही मान्यता मिळवण्यासाठी परिषदेच्या निरीक्षक समितीमार्फत महाविद्यालयाच्या अध्यापन, परीक्षा पद्धती, विद्यार्थ्यांचे हित, प्रशासनाची कार्यक्षमता, सामाजिक सहभाग आणि एकूणच शैक्षणिक गुणवत्ता या सर्व बाबींचे सखोल मूल्यमापन करण्यात आले.
या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक विश्‍वासार्हतेत मोठी भर पडली असून, हे यश विद्यमान तसेच भावी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी पाऊल ठरले आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व रोजगाराच्या संधींसाठी अधिक सक्षम करता येईल, असा विश्वास प्रकट करण्यात येत आहे.
प्राचार्य डॉ. सूर्यकांत भोसले म्हणाले, “ही मान्यता केवळ शिक्षकवर्गाच्याच नव्हे, तर आमच्या विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचा सन्मान आहे. भविष्यात अधिक संशोधनाधारित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.”
या यशस्वी वाटचालीत डॉ. लक्ष्मणराव ढोबळे,अब्राहम आवळे, जयंतीभाई हरिया, डॉ. श्वेता शेट्टी  क्रांती आवळे, डॉ. गिरीश लटके, ॲड.कल्याणी वानखेडे आणि ग्रंथालय टीम यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे.
स्थानिक पातळीपासून राज्यभरातून विद्यार्थ्यांनी आता अधिक आत्मविश्वासाने या महाविद्यालयात प्रवेश घेण्यास सुरुवात केली असून, पालकवर्ग आणि माजी विद्यार्थ्यांतून समाधानकारक प्रतिक्रिया उमटत आहेत.
Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »