महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

लोकशाहीला घातक असे निर्णय भाजपा सरकार कडून घेण्यात येत आहेत – नाना पटोले

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

गोंदिया/प्रतिनिधी – निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह अजित पवार गटाला दिलं यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारतीय निवडणूक आयोग ही भाजपाची स्क्रिप्ट वाचत असून त्यानुसार काम करत आहेत. यापूर्वीही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बाबतीत आणि आता शरद पवार यांच्या पक्षाच्या बाबतीत जे निर्णय घेतलेले आहेत त्यावरून हे स्पष्ट होते आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेता जे.पी नद्दा यांनी म्हटले होते की देशातले राजकीय स्थानिक पक्ष संपवायचे आहेत आणि त्या दृष्टीने आता भाजपा सरकार काम करत आहे. लोकशाहीला घातक असे निर्णय भाजपा सरकारद्वारा घेण्यात येत आहेत

मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांना एक कोटी रुपये दिल्याचा आरोप केला आहे यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, त्यांचे ते वैयक्तिक प्रश्न आहेत म्हणून आज ते महाराष्ट्र करून टोल वसूल करतायेत का? गरीब कामगारांच्या विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिपमध्ये कमिशन वसूल करतात आणि मेलेला माणसाच्या टाळूवरचे लोणी खातात असे हे कमिशनखोर सरकार आहे

मनसे यांचे वर्षा आणि सागर बंगल्यावर लोकसभेच्या निवडणुकीच्या संबंधाने खलबतं सुरू आहेत यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, सागर बंगल्यावर काय होते सर्वांना माहितच आहे. ईडी धमकावून काय केलं जाते हे संपूर्ण महाराष्ट्र जाणतो त्यांचे आमदार म्हणतात की आम्ही काहीही केलं तरी आमचा बॉस सागर बंगल्यावर बसला आहे. शासकीय सागर बंगल्याचा अपमान करण्याचं काम भाजपा नेते करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी गोंदिया येथे केला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »