महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी पर्यावरण

सायकलने पर्यावरणाचा संदेश देत स्वर्णिम चर्तुभुज वारी

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – स्वच्छ भारत, पर्यावरणपूरक भारत, प्रदूषण मुक्त भारत असा संदेश घेऊन नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या काही वरिष्ठ सायकल स्वारांनी देशाच्या स्वर्णिम चतुर्भज (Golden Quadrilateral) सायकल ने पुर्ण करण्याचा उप‍क्रम हाती घेतला. या प्रवासाच्या तिसऱ्या टप्प्यात 4 हजार सहाशे किलोमिटरचा प्रवास करून  गुरूवारी पहाटे ही टिम  दिल्लीत दाखल झाली. यावेळी त्यांनी  महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या 7 वरीष्ठ सायकलस्वारांनी स्वर्णिम चर्तुभुज प्रवास करण्याचा संकल्प करून 17 फेब्रुवारीपासून या सायकल प्रवासाला सुरूवात केली असून 2 मार्चपर्यंत  रिले पद्धती सायक्लिंग करून दिल्लीपर्यंतचा 4600 क‍िमीचा प्रवास पूर्ण केला. या सायकल समूहाने परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी ही त्यांच्यातील ऊर्जा आणि ऊत्साह कायम दिसत होता. परिचय केंद्राच्या माहिती अधिकारी अंजु निमसरकर यांनी या चमुचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी त्यांनी आपल्या सायकल प्रवासाविषयी सविस्तर माहिती दिली. नाशिक सायकलिस्ट फाँउडेंशन चे चंद्रकांत नाईक (72 वर्ष) यांनी सांगितले, निश्चित अशा उद्देशासाठी सायकल चालविणे हा आमचा संकल्प आहे. स्वर्णिम चतुर्भज हा सायकल प्रवास पूर्ण करीत असताना वर्तमानाची गरज ओळखून स्वच्छ भारत, पर्यावरण पूरक भारत, प्रदूषण मुक्त भारत असा संदेश देत या सायकल परिक्रमेला सुरवात झाली असल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यांच्या सायकल चमुमध्ये अनिल वराडे(68वर्ष) रमेश धोटे (64 वर्ष),रविंद्र दुसाने (62 वर्ष), अविनाश लोखंडे (62वर्ष), मोहन देसाई (60 वर्ष), संजय कुलकर्णी (60 वर्ष) केवळ वरिष्ठ नागर‍िक आहेत, हे विशेष. या चमुने 17 फेब्रुवारीला सुरूवात केली. प्रत्येक सायकलस्वार किमान 20 किमी सायकल चालतो पुढे दुसरा सायकलस्वार चालतो. असे रिले पद्धतीने सायकल चालवित असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

मागील 12 वर्षांपासून नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन असून या फाउंडेशनमध्ये सर्वच वयोगटातील किमान 4 हजार सायकलस्वार सदस्य  आहेत. प्रत्येक महिन्याला एक सायकल ट्रिप काढली जाते. यापूर्वी नर्मदा, गोदावरी परिक्रमा पूर्ण केल्या आहेत. पानिपत वारी असेही उपक्रम राबविले आहे. यासह पंढरपूरची, शिर्डीची, सिद्धिविनायक सायकल वारीही काढली जाते.  जन जागृतीपर दिनविशेष उपक्रमातही फाउंडेशनच्या माध्यमातून सायकलवरून जन जागृती उपक्रम राबविले जात असल्याचे चमुच्यावतीने सांगण्यात आले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »