महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी शिक्षण

श्री गजानन विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे जनजागृतीचे धडे

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण मधील श्री गजानन विद्यालय येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर गुन्हे जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या एपीआय दिपाली वाघ, सायबर सेक्युरिटी एक्सपोर्ट धर्मेंद्र नलावडे व ऍड श्वेता बाबर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एपीआय दिपाली वाघ यांनी पोलिसांची भूमिका स्पष्ट केली. परिसरात अल्पवयीन, कुमारवयीन मुलांशी संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांची माहिती दिली. अशा वेळी गुन्हा सहन करू नये घाबरू नये तर आपले पालक शिक्षक पोलीस यांच्याशी मोकळा संवाद साधण्याचे आवाहन केले. गुड टच बॅट टच पोक्सो  कायद्याची माहिती मुलांना देण्यात आली.

धर्मेंद्र नलावडे यांनी इंटरनेटचा अति व निष्काळजी वापरातून निर्माण होणारे गुन्हे आयटीआर २००० याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोबाईलचा वापर गरजेपुरता करावा. अनोळखी लिंक किंवा कोड चा वापर करू नये, ओटीपी शेअर करू नये, इंटरनेटच्या आभासी जगापासून सावध राहून केवळ गरजेपुरताच मोबाईलवापर करावा अन्यथा टाळावा असे सांगितले. इंटरनेटचा वापर करताना परिपूर्ण माहिती करून घ्या काळजीपूर्वक वापरा अमिषांना बळी पडू नका असा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन शंका समाधान करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका माध्यमिक विभाग कांचन भालेराव, संस्थेचे सचिव केदार पोंक्षे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका माळी मॅडम उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांचे स्वागत इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या सीड बॉल्स व पर्यावरण पूरक कापडी पिशव्या देऊन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे आभार माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कांचन भालेराव यांनी मानले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »