महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

उल्हासनगर धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी समिती गठीत,१५ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई/प्रतिनिधी – उल्हासनगर येथील धोकादायक इमारतींचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव १ व २, सहकार आयुक्त, ठाणे जिल्हाधिकारी, सेटलमेंट आयुक्त आणि उल्हासनगर महापालिका आयुक्त आणि  शहर नियोजन तज्ज्ञांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. या समितीला आपला अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नागरिकांना तातडीने दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने या धोकादायक इमारतींना लवकरात लवकर नियमित करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. बैठकीत कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार डॉ.बालाजी किणीकर, उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठक, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते.

पुनर्विकासाचे सर्वंकष धोरण तयार करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला असून, येत्या 15 दिवसात ही समिती शासनाला आपला अहवाल सादर करेल. या समितीने केलेल्या शिफारशीनुसारच उल्हासनगरच्या प्रदीर्घ रखडलेला पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल. जीव मुठीत धरून गुजराण करणाऱ्या लोकांचा जीव वाचवण्याला प्राधान्य असल्याने हा अहवाल सादर झाल्यावर तातडीने त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी घेऊन नवीन धोरण अमलात येईल, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »