महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image लोकल बातम्या

स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त केडीएमसीतर्फे स्वच्छता जनजागृती रॅली

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – स्वच्छता ही एक सवय असून प्रत्येक नगरिकाने त्यात सहभाग घेतल्यास आपोआप एक लोकचळवळ उभी राहील आणि त्यातूनच आपले शहर स्वच्छ , सुंदर होईल असा विश्वास कल्याण डोंबिवलीचे महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी व्यक्त केला. स्वच्छ अमृत महोत्सवाचे औचित्य साधून केडीएमसीतर्फे आज स्स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. यामध्ये कल्याणच्या विविध शाळा – महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसह केडीएमसीचे अनेक अधिकारी – कर्मचारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी सुरुवातीला स्वच्छतेची शपथही घेतली.

आज देशामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत इंदौर आणि नवी मुंबई या शहरांमध्ये पहिल्या क्रमांकाची चढाओढ दिसून येते. कारण तिथे राहणाऱ्या नागरिकांनी या स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने त्याला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आपली शहरेही सुंदर आणि स्वच्छ होण्यासाठी प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेची सवय लावून घ्यावी लागेल असे आवाहनही केडीएमसी आयुक्त डॉ. दांगडे यांनी यावेळी केले.

दरम्यान आज सकाळी केडीएमसी मुख्यालयापासून निघालेल्या या रॅलीला आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे, इंडीयन मेडीकल असोसिएशन कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतूल पाटील, केडीएमसी शिक्षण विभागाचे प्रमुख विजय सरकटे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

केडीएमसीतून निघालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, लालचौकीमार्गे दुर्गाडी किल्ला आणि दुर्गाडी गणेश घाटापर्यंत काढण्यात आली. त्यानंतर रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांनी दोन्ही ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »