महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

कल्याणच्या सहजानंद चौकातील वाहतूक बदल ठरतोय नागरिकांसाठी डोकेदुखी

DESK MARATHI NEWS NETWORK. 

कल्याण/संघर्ष गांगुर्डे –  कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकात होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपासून वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. मात्र वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केलेले हे वाहतूक बदल म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असल्याचे चित्र दिसत आहे. हा वाहतूक बदल नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा वाहतूक बदल त्वरित रद्द करावा अशी मागणी माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी केली आहे. जर हा वाहतूक बदल बंद झाला नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने तो बंद करू असा इशारा माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी दिला आहे.

कल्याण पश्चिमेतील महत्त्वाच्या आणि वाहतुकीच्या दृष्टीने मोठा असणाऱ्या सहजानंद चौकामध्ये होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी काही दिवसांपासून मार्गात बदल केले आहेत. ज्यामध्ये सहजानंद चौकातून संतोषी माता रोड आणि जैन सोसायटीकडे जाणाऱ्या मार्गात बदल करून हे दोन्ही मार्ग येण्या – जाण्यासाठी एक दिशा मार्ग करण्यात आले आहेत. त्यासाठी वाहतूक पोलिसांकडून सहजानंद चौकात बॅरीकेटिंग करण्यात आले आहे. मात्र या वाहतूक बदलांना माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी तीव्र विरोध केला आहे. तसेच या नव्या वाहतूक बदलांमुळे अंतर्गत भागात मोठी वाहतूक कोंडी होऊ लागल्याचे सांगत हे बदल तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच हे वाहतूक बदल म्हणजे नागरिकांना विनाकारण वेठीस धरण्याचा प्रकार असून त्यामाध्यमातून वाहतूक पोलिस केवळ आपली जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या नव्या बदलामुळे जैन सोसायटी, संतोषी माता रोड परिसरात आता मोठी वाहतूक कोंडी होऊ लागली असून स्थानिक नागरिक त्यामुळे प्रचंड हैराण झाले असल्याचेही समेळ यांनी सांगितले.

हे अनावश्यक वाहतूक बदल करण्याऐवजी आहेत त्या नियमांची अंमलबजावणी केली तरी वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल. ज्यामध्ये काझी हॉस्पीटल शेजारी बेतुरकर पाड्याकडे एकदिशा मार्ग, सहजानंद चौकात सिग्नल यंत्रणा, तलावाकडे जाणाऱ्या मार्गावर दुकानांबाबरील अनधिकृत पार्किंग हटवणे, अहिल्याबाई चौकातून सहजानंद चौकाकडे येणारी वाहतूक बंद करणे असे महत्त्वाचे बदल श्रेयस समेळ यांनी सुचवले आहेत. तसेच वाहतूक पोलिसांनी नविन वाहतुकीचे नियम तातडीने बंद करावे अन्यथा आम्हीच हे शिवसेना स्टाईलने बॅरीकेटिंग काढून टाकू असा इशाराही त्यांनी वाहतूक पोलिसांना दिला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »