महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे लोकप्रिय बातम्या

महावितरणच्या कल्याण परिमंडलात महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – जात, धर्म आणि पंथांच्या भेदातून मुक्त स्वराज्य स्थापन करण्याची किमया छत्रपती शिवाजी महाराजांनी जगात सर्वप्रथम केली. त्यांनी लोककल्याणाला केंद्रस्थानी ठेवून राज्य स्थापनेची व्याख्याच बदलली. लोकांच्या इच्छेतून राष्ट्राची निर्मिती होते. हे स्वप्न त्यांनी साकारले, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले.

महावितरणच्या कल्याण परिमंडलाच्या वतीने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कला मंदिरात मंगळवारी (६ जून) आयोजित महापुरुषांच्या संयुक्त जंयती उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर होते. ज्येष्ठ साहित्यिक कांबळे यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारीक नात्याची गुंफण उलगडून दाखवली. महात्मा फुले यांनी लोककल्याणकारी शिवाजी महाराजांचे रयतेचा राजा म्हणून असलेले महत्व लोकांसमोर मांडले. तर शाहू महाराजांनी आपल्या कार्यक्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज व महात्मा फुले यांनी मांडलेल्या विचारांना मुर्त रुप दिले. या तिन्ही महापुरुषांनी रुजविलेल्या जनकल्याणकारी विचारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून कळस चढवला असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले. अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, विजय मोरे, संदीप पाटील, महेश अंचिनमाने, महाव्यवस्थापक अनिल बऱ्हाटे, उप महाव्यवस्थापक सुनिल पाठक, उपसंचालक सुमीत कुमार यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. अभियंते, अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता चंद्रमणी मेश्राम यांनी यांनी केले. तर अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांनी आभार मानले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »