महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
तंत्रज्ञान लोकप्रिय बातम्या

जळगाव जिल्ह्यात तलाठी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना सर्व्हर डाउन चा फटका,उमेदवार संतप्त

नेशन न्यूज मराठी टिम.

जळगाव/प्रतिनिधी– जळगाव जिल्ह्यातील तलाठी परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना सर्वर डाउन चा फटका बसला आहे.सर्व्हर डाउन असल्यामुळे तब्बल दोन तासपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेला विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सकाळी नऊ वाजता तलाठी भरती चा पहिला पेपर होता. मात्र सर्व्हर झाल्यामुळे हा पेपर साडेअकरा वाजता सुरू झाला. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता ज्या उमेदवारांचा पेपर होता त्यांची दुपारी अडीच वाजता परीक्षा होणार.

दरम्यान परीक्षेसाठी नंदुरबार तसेच जळगाव मध्य प्रदेश सीमेवरील तसेच विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थी हे वेळेवर दाखल झाले.मात्र या ठिकाणी त्यांना सर्व्हर डाउन ची अडचण सांगून पेपर उशिराने सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.सर्व्हर डाउन मुळे तब्बल दोन तास ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे रात्री साडेआठ वाजेपर्यंत या परीक्षा सुरू राहणार आहे.या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी कुठलीही बसण्याची व्यवस्था नसल्याने उमेदवारांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे तसेच आमचा जो वेळ वाया गेला याला जबाबदार कोण असाही प्रश्न या ठिकाणी तरुण तरुणी तसेच परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांनी उपस्थित केला आहे आहे.

एक विवाहितेचा तर चक्क परीक्षेसाठी येत असताना रस्त्यात अपघात झाला मात्र यानंतरही अपघातग्रस्त चार चाकी जागेवरच सोडून दुसऱ्याची दुचाकी घेऊन त्या या ठिकाणी वेळेवर पोहोचल्या मात्र आता त्यांना या ठिकाणी तब्बल दोन तास उशिराने पेपर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आल्याने यावेळी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »