महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर

मंदिर उघडण्यासाठी भाजपाचे कल्याणात घंटानाद आंदोलन

प्रतिनिधी.

कल्याण – भारतीय जनता पार्टी कल्याण पश्चिमच्या वतीने गजानन महाराज मंदिरासमोर घंटानाद आंदोलन संपन्न झाले. गेली पाच महिने महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद आहेत. राज्यातील सर्व मंदिरे तातडीने सुरू करावीत यासाठी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

कोरोना (कोविड) महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पाच महिन्यांपुर्वी बंद केलेली मंदिरे(प्रार्थनास्थळे) अद्यापपर्यंत बंद स्थितीत आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन शिथील करण्याची प्रक्रिया १ जून २०२० पासून सुरू झालेली आहे. यानुसारच राज्यातील दारुची दुकाने खुली करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. असे असताना सर्व मंदिरे(प्रार्थनास्थळे) बंद ठेवून सरकारला नेमके काय साध्य करायचे आहे? महाराष्ट्र हे भक्ती सांप्रदायाची उज्ज्वल परंपरा असलेले सुसंस्कृत राज्य आहे. तसेच सर्व प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी त्या भागातील अनेक कुटुंबांची उपजीविका व संबंधित भागाची अर्थव्यवस्था तेथे येणाऱ्या भाविकांवर अवलंबून आहे. परंतु मागील पाच महिन्यांपासून मंदिरे(प्रार्थनास्थळे)बंद असल्यामुळे तेथील सर्वकाही विस्कळीत झाले आहे.अशा वेळी दीर्घकाळ मंदिरे(प्रार्थनास्थळे) बंद ठेवणे महाराष्ट्र राज्याच्या भक्ती परंपरेला भूषणावह नाही. म्हणून राज्यातील सर्व मंदिरे(प्रार्थनास्थळे) कायमस्वरूपी खुली करावीत अशी मागणी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी केली.यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव अनिल पंडित, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सदस्या प्रिया शर्मा,भावना मनराजा, प्रताप टूमकर, विशाल शेलार, गणेश गायकर, सदा कोकणे,रोहित लांबतुरे, राज खैरणार, हर्षल साने आदी उपस्थित होते. सोशल डिस्टंन्सिंगच्या सर्व सरकारी नियमांचे पालन करुन घंटानाद आंदोलन करण्यात आले.

Related Posts
Translate »