नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – धनगर समाज अजूनही वंचितच आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपला समावेश एस टी संवर्गात व्हावा या मागणीसाठी सध्या अमरावती येथे समाज बांधव साखळी उपोषणाला बसले होते. परंतु हे साखळी उपोषण आता स्थगित केले गेले आहे.
काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांच्या आश्वासनाने हे उपोषण सुटलं आहे.धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न राहुल गांधींपर्यंत पोहचवणार असे यशोमती ठाकूर यांनी उपोषणकर्त्यांना आश्वासन दिले.
धनगर समाजाच्या साखळी उपोषणाची सांगता करण्यासाठी यशोमती ठाकूर आल्या होत्या, यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप जेव्हा जेव्हा सत्तेत येते, तेव्हा तेव्हा एका समाजाला दुसऱ्या समाजासोबत भिडवते.असा आरोप देखील त्यांनी केला.