महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

केडीएमसी प्रभाग रचनेबाबत भाजपचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेतील कलगीतुरा रंगण्यास हळूहळू सुरुवात झाली आहे. प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून कल्याण जिल्हा भाजपने शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून निवडणूक गोपनीयतेचा भंग झाल्याचा आरोप केला आहे. कल्याण जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

केडीएमसी निवडणुकीच्या प्रभाग रचनेसाठी सत्ताधाऱ्यांनी खासगी एजन्सी नियुक्त केल्याचे सांगत प्रभाग रचनेची माहिती सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडे उपलब्ध असल्याचा गंभीर आरोप कांबळे यांनी यावेळी केला. या बदलणाऱ्या वॉर्डची रचना त्यांच्या कार्यकर्त्यांकडे अगोदरच कशी काय उपलब्ध आहे? तसेच त्यांच्याकडून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचे सांगत कोणाच्या तरी सांगण्यावरून वॉर्ड रचना केली जात आहे. ते केवळ भाजपला अडचणीत आणण्यासाठी आणि भाजपचे नगरसेवक कमी करण्यासाठी हे सर्व सुरू असल्याचा आरोपही शशिकांत कांबळे यांनी यावेळी केला. हे सर्व लोकशाहीला मारक कृत्य असून सर्व पक्ष आणि संस्थांना सोबत घेऊन वॉर्ड रचना करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
तर सत्ताधाऱ्यांच्या या कृत्यांविरोधात आम्ही लोकशाही आणि न्यायालयीन मार्गाने लढा देऊ आणि त्यांना नक्कीच धडा शिकवू असा इशाराही कांबळे यांनी यावेळी दिला.
दरम्यान भाजपने केलेल्या या सर्व आरोपांवर आता सत्ताधारी पक्षांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते ते लवकरच स्पष्ट होईल.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »