नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील शेवटची निवडणूक 20 मे रोजी होणार असून यात मुंबईतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या सहा मतदारसंघांचा समावेश होतो. निवडणुकीची सुरुवात व्हायला 4 दिवस शिल्लक असताना महायुतीचा मुंबईत जोरदार प्रचार सुरू आहे. दक्षिण मध्य मुंबईत महायुतीकडून राहुल शेवाळे तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांच्यात सुरशीची लढत होणार आहे.
राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ मानखुर्द येथे महायुतीच्या सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या समेत महायुतीच्या अनेक बड्या नेत्यांनी आपली हजेरी नोंदवली. माध्यमांशी बोलताना महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे म्हणाले “महायुतीची प्रचार सभा आज मोठ्या उत्साहात पार पडली. दिवसेंदिवस लोकांचा उत्साह आणि प्रतिसाद प्रचारात वाढताना दिसत आहे. काल मुख्यमंत्री आले होते आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली.”
तसेच मुंबईत करण्यात येणाऱ्या विकसांच्या कामाबद्दल त्यांनी भाष्य केले. “महाराष्ट्र नगर सबवे च्या विषयातून सुटका करून मुंबई महानगर पालिकेकडून दोन ब्रिज मंजूर करण्यात आले आहे. त्याचे टेंडर पण काढण्यात आले. त्याचप्रमाणे मानखुर्द घाटकोपर लिंक रोडचा ब्रिज एक्सटेंड करून महाराष्ट्र नगर मध्ये आणत आहोत. मानखुर्द स्टेशनचा जो ब्रिज आहे तो युटूर्न करून महाराष्ट्र नगर मध्ये आणणार आहोत. त्यामुळे दोन ब्रिज महाराष्ट्र नगरला उपलब्ध होतील भविष्यात महाराष्ट्र नगरची रीडेव्हलपमेंट झाल्यानंतर मुंबई पुणे हायवे वर जायला मिळेल. मुंबई आणि वाशीच्या दोन्ही दिशेला जायला मार्ग होईल. भव्य कारशेड डेपोचा प्रोजेक्ट झाल्यानंतर त्याचा लोकांना फायदा होईल.” अशी अनेक आश्वासने महायुतीचे उमेदवार खासदार राहुल शेवाळे यांनी दिली आहेत.