महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
आरोग्य चर्चेची बातमी

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत२६ कोटी आयुष्मान कार्डांचा टप्पा ओलांडला

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (AB PM-JAY) ने 19 ऑक्टोबर 2023 रोजी देशभरात 26 कोटी आयुष्मान कार्ड्सचा टप्पा ओलांडला आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाद्वारे राबविण्यात येत असलेली प्रमुख योजना 12 कोटी लाभार्थी कुटुंबांना दुय्यम आणि तृतीयक काळजी रुग्णालयात उपचार घेता यावेत यासाठी प्रति कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांचे आरोग्य कवच प्रदान करते.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्डांची निर्मिती हा सर्वात मूलभूत उपक्रम आहे आणि योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याकडे आयुष्मान कार्ड असावे, याची सुनिश्चिती करण्यासाठी सातत्याने ठोस प्रयत्न केले जात आहेत. भारत सरकारच्या आरोग्य योजना सर्वांपर्यंत पोहोचणे सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भव मोहिमेतील हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी मोहीम सुरू झाल्यापासून, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या माहिती तंत्रज्ञान मंचावर 1.5 कोटींहून अधिक आयुष्मान कार्ड विनंत्या यशस्वीरित्या प्राप्त झाल्या आहेत. ऑक्टोबर 2023 महिन्यात, 19 ऑक्टोबर 2023 पर्यंत 86 लाख आयुष्मान कार्डस तयार करण्यात आली आहेत.

अति दुर्गम ठिकाणी राहणाऱ्या लोकांपर्यंत व्याप्ती पोहोचण्यासाठी साठी , प्राधिकरणाने आयुष्मान कार्ड निर्मितीकरिता ‘आयुष्मान अॅपचा’ प्रारंभ केला आहे. अॅपमध्ये सेल्फ-व्हेरिफिकेशनचे वेगळे वैशिष्ट्य आहे. कोणत्याही कार्ड निर्मिती केंद्राला भेट न देता सोप्या 4 टप्प्यांमध्ये, हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना आयुष्मान कार्ड तयार होण्यास सक्षम करते. याखेरीज कोणतीही व्यक्ती लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड तयार करण्यासाठी मदत करू शकते. अशा प्रकारे, आयुष्मान अॅप जन भागिदारीला बळकटी देते. दिनांक 13 सप्टेंबर 2023 रोजी अॅपचा प्रारंभ झाल्यापासून ते 26 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले आहे. यावरून या अॅप्लिकेशनचे यश दिसून येते.

आयुष्मान कार्ड आता समानता, हक्क आणि सक्षमीकरणाचे प्रतीक बनले आहे. गरीब आणि वंचित कुटुंबाला आजार आणि त्याच्या उपचारांसाठी होणाऱ्या आकस्मिक खर्चाच्या दुहेरी संकटाच्या परिणामांपासून संरक्षणाचे कवच पुरवण्याची हमी हे कार्ड देते. ही वस्तुस्थिती अधोरेखित करून, सर्व पात्र लाभार्थ्यांकडे आयुष्मान कार्ड असावे, या सुनिश्चितीसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

सर्वाधिक 4 कोटी आयुष्मान कार्डसह, उत्तर प्रदेश राज्यांच्या यादीत अव्वल आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड अनुक्रमे 3.69 कोटी आणि 2.04 कोटी आयुष्मान कार्डांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शिवाय, 49% आयुष्मान कार्डधारक महिला लाभार्थीं आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5.7 कोटी व्यक्तींना 70,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे रुग्णालय प्रवेश शक्य झाले आहेत. अशा प्रकारे, गरीब आणि वंचित कुटुंबांच्या 1 लाख कोटींहून अधिक खर्चाची बचत शक्य झाली आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »