महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

राज ठाकरे यांनी नाशिकचा विकास केला म्हणुन उपमुख्यमंत्र्यांसाठी काही शिल्लकच राहिलेलं नाही – सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

नेशन न्यूज मराठी टीम.

गोदिया/प्रतिनिधी – कर्नाटक निकालानंतर राजकीय पक्षामध्ये एकमेकांवर टीका करण्याची स्पर्धा लागल्याची दिसून आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपवर वेगवेगळ्या मुद्द्यांवर बरसताना दिसले. त्यातच भाजप नेतेही त्यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना दिसून आले.

राज ठाकरे यांनी विधान केले होते की नाशिकचा विकास मी केला ज्यानी शहर दत्तकं घेतले त्यांनी काय केले अशी टीका देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली होती.याबद्दल माध्यमांनी मंत्री सुधीरमुनगंटीवार यांना विचारणा केली असता, उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की जर सर्व विकास राज ठाकरे यांनी केला तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काही ठेवले नाही अशी बोचरी टीका राज ठाकरे यांच्या वर केली.

राज ठाकरे यांनी भाजपा वर कर्नाटक निकालावरून टीका केली त्यावर भाजपाने इतरांनी सल्ला देऊ नये असा हल्लाबोल केला त्यावर राज ठाकरे बोलले की भाजपा दुसऱ्यांच्या बोलण्यावर लिहण्यावर बंदी आणणार का ?आणि भाजपा वाले वाटेल त्या विषयावर बोलणार अशी टीका केली त्यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की भाजपाने कधी ही बोलण्यावर आणि लिहण्यावर कधीही बंदी घातली नाही. उलट राज ठाकरे यांनी मुंबई मध्ये दुसऱ्यांच्या मुंबई येण्यावर, फिरण्यावर बंदी घातली , पाट्यावर बंदी घातली होती असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज ठाकरे यांना लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×