महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महाराष्ट्र

पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार कार्यवाही कापूस,तूर, हरभरा पिकाच्या शिल्लक साठा दोन दिवसांत नोंदविण्याचे आदेश

प्रतिनिधी.

अकोला – शेतकऱ्यांकडे अद्याप विक्री अभावी शिल्लक असलेला कापूस, तूर, हरभरा या कृषि मालाची येत्या दोन दिवसांत जिओ टॅगिंगसह फोटो काढुन नोंद करावी व अहवाल पाठवावा असे आदेश जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी दिले आहेत. यासंदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी निर्देश दिले होते.
कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमिवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल जसे कापूस, तूर, हरभरा इ. खरेदीसाठी नोंदणी करुनही अद्याप खरेदी झालेला नाही. अशा शेतकऱ्याकडे पडून असलेल्या शेतमालाची तपासणी, नोंदणी व जिओ टॅगिंग सह छायाचित्रण करावे व अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना नोंदणी करुन अहवाल सादर करण्यासास्ठी आदेशीत केले. त्यानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी त्यांच्या अधिपत्याखालील यंत्रणेस तालुका कृषि अधिकाऱ्यांमार्फत मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक, कृषि मित्र आदींना आदेशीत केले आहे. या यंत्रणेने दोन दिवसांत ही कार्यवाही पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यवाहीचे नियंत्रण तालुका तंत्र व्यवस्थापन सहाय्यक (आत्मा) व सहाय्यक तंत्र व्यवस्थापक (आत्मा) यांनी करावे, असे निर्देशित करण्यात आले आहे.
या संदर्भात गुरुवारी (दि.२१) झालेल्या बैठकीत पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी निर्देश दिले होते की, शेतकऱ्यांनी सीसीआय वा फेडरेशन या सारख्या संस्थांकडे माल विक्रीसाठी नोंदणी केली होती. तथापि अद्याप प्रत्यक्षात कापूस वा अन्य शेतमालाची प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया होणे बाकी आहे. अशा मालाची जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उपविभागीय अधिकारी यांच्या अधिपत्याखालील तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक, कृषि मित्र इ. गावपातळीवरील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन त्यामार्फत तपासणी करुन शिल्लक मालाचे जिओ टॅगिंगसह छायाचित्र काढून ऑनलाईन नोंदीनुसार तपासणी करावी व वस्तुस्थितीचा अहवाल जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अकोला यांनी मंगळवार दि.२६ पर्यंत सादर करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी काल (दि.२२)आदेशात म्हटले आहे. त्यानुसार कृषि विभागाने आजचे आदेश जारी केले आहेत.

Related Posts
Translate »