नेशन न्यूज मराठी टीम.
धुळे / प्रतिनिधी – धुळे जिल्ह्यातील चंदन उत्पादक शेतकऱ्याच्या शेतातून रात्रीतून चक्क 65 चंदनाच्या झाडांची तष्करी झाल्याची घटना घडली आहे. उभी चंदनाचे झाडे कापून चंदन तष्करी करणारा हा धुळे जिल्ह्यातील विरप्पन कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्याला या चोरीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या भोरखेडा येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्रसिंग लोटनसिंग राजपूत यांनी 15 वर्षांपूर्वी आपल्या तीन एकर क्षेत्रात एक हजार पांढऱ्या चंदनाच्या झाडांची लागवड केली होती. या क्षेत्राच्या चौफेर बाजुने काटेरी झुडपे लावण्यात आली आहेत. संपूर्ण कुटुंब रात्रंदिवस या चंदनाच्या झाडांची काळजी घेत असतात. आता यातील काही चंदनाचे झाड हे परिक्व झाले आहेत. मात्र यांच्या या चंदनाच्या झाडावर चंदन तष्करांनी लक्ष केंद्रित केले आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी सुमारास चंदन तष्करांनी शेतातील 25 चंदनाचे उभी झाडे कापून नेली होती. त्यासोबत 70 पेक्षा जास्त झाडांना करवत लावून कापण्याचा प्रयत्न झाला होता. तर काल रात्री पुन्हा 40 चंदनाच्या झाडांची तष्करी करण्यात आली आहे. या घटनेमुळे मात्र शेतकरी चिंतेत आहेत.
शिरपूर तालुक्यात चंदनचा झाडांची तष्करी करणारा हा नवीन विरप्पण कोण तयार झाला आहे असा प्रश्न आता या परिसरातील शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. यांच्या 65 चंदन झाडांच्या तष्करीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले आहे. तष्करांनी करवतने काही भाग कापून तपासणी करून परिक्व असलेले चंदानाचे झाडे कापली. त्या झाड आणि खोडमधील भाग कापून शेतापासून काही अंतरावरील कापूसच्या शेतात घेऊन गेले तेथे त्यामधील चंदनाचा महत्त्वाचा गाभा काढण्यात आणि त्या गाभाची तष्करी करण्यात आली आहे. यापूर्वी देखील दोन वेळा भरतसिंग राजपूत यांच्या या चंदनाच्या शेतातून चंदन झाडांची तष्करीची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीसांकडून देखील योग्य दखल घेण्यात येत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
पांढऱ्या चंदनाच्या झाडांची किंमत ही अंदाजे एक घनफुट 6 ते 10 हजार रुपये ईतकी असून एका झाडावर 15 ते 20 घनफुट चंदन असते. त्यामुळे या 65 झाडांच्या तष्करीमुळे लाखोंचे नुकसान शेतकऱ्यांना झाले आहे. चंदन तष्करी करणारा हा नवीन विरप्पन कोण ? असा प्रश्न आता शेतकऱ्यांना उपस्थित होत आहे. याकडे पोलीसांनी देखील लक्ष देण्याची गरज या चंदन तष्करी सारख्या घटनांमुळे जिव धोक्यात घालून कोणीही चंदनाचे उत्पन्न घेणार नाही असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.