महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image इतर मुख्य बातम्या

कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास महिलेस एकरकमी अनुदान योजना,नवी मुंबई मनपाचे योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नवी मुंबई/प्रतिनिधी – नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत आर्थिकदृष्टया दुर्बल घटकाच्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यास महिलेस (पत्नीस) एकरकमी अनुदान देणे ही योजना राबविण्यात येत आहे.मार्च-2020 पासून कोव्हीड-19 या साथरोगामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जी कुटुंब प्रभावित झालेली आहेत अशा कुटूंबांना कठीण परिस्थितीच्या काळामध्ये महानगरपालिकेकडून हातभार म्हणून रक्कम रु.25 हजार एकरकमी अर्थसहाय्य या योजनेव्दारे देण्यात येते.याकरिता महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे योजनेच्या अटी / शर्तीमध्ये सुधारणा करणेबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्यास आयुक्त तथा प्रशासक यांनी दि. 22 मार्च 2021 रोजीच्या ठराव क्र.743 नुसार मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदर योजनेमध्ये बदल / सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत ज्या महिलेच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत अशा लाभार्थ्यांना यापूर्वी हा लाभ मिळत नव्हता. तथापि हा कालावधी कोव्हीड कालावधी असल्यामुळे महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी याबाबत विशेष लक्ष देत या कालावधीत ज्या महिलेच्या वयाची 60 वर्षे पूर्ण झालेली आहेत त्यांना या कालावधीपूरती 60 वर्षाच्या वयोमर्यादेत सूट दिलेली आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ करत 500 वरुन 1000 लाभार्थी संख्या करण्यात आलेली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधी पतीच्या मृत्यू दिनांकानंतर 1 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षाचा करण्यात आलेला आहे. याकरिता विहित नमुन्यातील अर्जासोबत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 3 वर्ष वास्तव्य असणेबाबतचा पुरावा, लाभार्थी महिलेचे वय 21 ते 60 वर्ष यामध्ये असल्याबाबतचा असणेबाबतचा पुरावा, महिलेचे पॅनकार्ड व आधारकार्डची छायांकीत प्रत, पतीचा मृत्यू दाखला, बॅंक पासबुकची छायांकीत प्रत असणे आवश्यक आहे. विहीत नमुन्यातील अर्ज नवी मुंबई महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच हे अर्ज बेलापूर भवन, सेक्टर 11, सीबीडी, बेलापूर येथील समाजविकास विभागाचे कार्यालय तसेच विभाग कार्यालयात उपलब्ध असून त्याठिकाणीच ते स्विकारले जातील.तरी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांना याव्दारे आवाहन करण्यात येते की त्यांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »