महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महाराष्ट्र मुख्य बातम्या

राष्ट्रीय जल पुरस्कार २०२० करिता १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

प्रतिनिधी.

मुंबई – जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन, मंत्रालय, भारत सरकार यांचेकडून जलसंवर्धन व व्यवस्थापन करण्याऱ्या राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, शाळा, उद्योग, अशासकीय संघटना अशा घटकांकडून विविध श्रेणींमध्ये ‘राष्ट्रीय जल पुरस्कार 2020’ करिता 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

भारतातील विविध भागामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे संवर्धन व परिरक्षण करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने जनजागृती होणे देखील आवश्यक आहे. म्हणून विविध क्षेत्रात जलसंवर्धन व व्यवस्थापन करण्याऱ्या विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय जल पुरस्कार सन 2018 पासून देण्यात येतो.

त्यानुसार यावर्षी 3 रा राष्ट्रीय जल पुरस्कार, 2020 विविध श्रेण्यांमध्ये देण्याचे प्रस्तावित आहे. यात उत्कृष्ट राज्य, जिल्हा, नगरपरिषद, ग्रामपंचायत, शाळा, मोठे, मध्यम व लघु उद्योग, जल नियमन प्राधिकरण, जल योद्धा, अशासकीय संघटना, पाणी वापर संस्था, दूरचित्रवाहिनी कार्यक्रम, हिंदी/ मराठी/ इंग्रजी वर्तमानपत्र, अशा एकुण 11 श्रेणींमध्ये काम करणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती/ संस्था/ कंपनी यांनी परिपूर्ण नामांकने/ प्रस्ताव/ दि. 10 फेब्रुवारी, 2021 रोजीपर्यंत https://mygov.in या वेबसाईटवर किंवा nationalwaterawards@gmail.com या ई-मेल वर केवळ ऑनलाईन सादर करावेत, असे आवाहन र.ग.पराते, उपसचिव, लाक्षेवि (आस्था), जलसंपदा विभाग, मंत्रालय, यांनी केले आहे.

याबाबत अधिक माहिती व मार्गदर्शनाकरिता 022-22023096 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क  करावा, असे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

Related Posts
Translate »