महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ठाणे न्युजरूम

प्रगत पोस्टल टेक्नॉलॉजीची अंमलबजावणी करण्यासाठी २ ऑगस्ट रोजी पोस्टाचे सर्व व्यवहार राहणार बंद  

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – भारतीय डाक विभागाने उत्कृष्टता आणि राष्ट्र उभारणीच्या दिशेने  सज्ज होण्यासाठी  त्यांच्या पुढील पिढीतील प्रगत पोस्टल टेक्नॉलॉजी (एपीटी) प्रणालीची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली असून संपूर्ण महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात ०४ ऑगस्ट २०२५ रोजी हि प्रणाली लागू होत आहे. या परिवर्तनकरी उपक्रमाचा भाग म्हणून कल्याण आणि डोंबिवली (यामध्ये कल्याण मुख्य डाक घर ऑफिससह , तसेच अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील सर्व पोस्ट  ऑफिस मध्ये ०४ ऑगस्ट २०२५ रोजी हि अपग्रेड केलेली प्रणाली लागू होणार आहे. या प्रगत यंत्रणा सक्षम करण्यासाठी दिनांक ०२ ऑगस्ट २०२५ (शनिवार)  रोजी नियोजित डाऊन टाइम घेण्यात येणार आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिस मध्ये कोणतेही व्यवहार केले जाणार नाहीत. डेटा मायग्रेशन, सिस्टम व्हेलीडेशन  आणि कॉन्फिगरेशन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, नवीन सिस्टम सुरळीत आणि कार्यक्षमतेने सुरु होईल याची खात्री करण्यासाठी हे तात्पुरते निलंबन आवश्यक आहे.   

“ टपाल विभाग पूर्वी खाजगी आयटी प्रदात्यावर अवलंबून होता आणि आता इन-हाऊस सिस्टीमकडे वळण्यामुळे अनेक फायदे होतील – ज्यामध्ये सुव्यवस्थित अकाउंटिंग, रिअल-टाइम सेटलमेंट, सुधारित ग्राहक संवाद आणि क्यूआर कोड-आधारित पेमेंटसाठी समर्थन यांचा समावेश आहे, जे जुन्या सेटअपमध्ये शक्य नव्हते. ग्राहक-केंद्रित सिस्टीम वापरकर्त्यांच्या फोनवर थेट रिअल-टाइम पार्सल ट्रॅकिंग अपडेट्स देखील पाठवेल, ज्यामुळे सेवा पारदर्शकता आणि कार्यक्षमतेत लक्षणीय झेप येईल.  आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांना विनंती करतो कि त्यांनी त्यांच्या भेटीचे आगाऊ नियोजन करावे आणि या छोट्या व्यत्ययादरम्यान आमच्यासोबत राहावे. सदर उपक्रमासाठी २ ऑगस्ट रोजीच्या नियोजित डाऊनटाइम साठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन नागेश खैरनार – पोस्टमास्टर, कल्याण सिटी हेड पोस्ट ऑफिस, कल्याण यांनी नागरिकांना केले आहे.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »