नेशन न्यूज मराठी टीम.
अमरावती / प्रतिनिधी – राज्य शासनाने कंत्राटी नोकर भरतीचा जी आर काढला आहे. शिवाय शाळांचे खाजगीकरण देखील केले जाणार आहे. हे दोन्ही निर्णय जनहिताचे नाहीत म्हणून निषेध व्यक्त केले जात आहे. अमरावती येथे आजाद समाज पार्टीने देखील आंदोलन करत निषेध केला आहे.
राज्य सरकारने सरकारी जागा या खाजगी एजन्सी मार्फत कंत्राटीवर भरण्याचा निर्णय घेतला. तसेच राज्यातील 62 हजार शाळांचे खाजगीकरण करण्याचाही निर्णय घेतला. या विरोधात आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजाद समाज पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. हा निर्णय बहुजन विरोधी निर्णय असून सरकारने हा निर्णय रद्द करावा, यासाठी आझाद समाज पार्टी च्या वतीने सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.