नेशन न्यूज मराठी टीम.
जालना / प्रतिनिधी – जालना जिल्ह्यातील मराठा क्रांती उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा परिणाम संगमनेरात बघायला मिळत आहे.मराठा क्रांती मोर्चाच्या कडुन धुळे सोलापूर रोडवर एसटी महामंडळाच्या बसला आग लावण्यात आली. त्याची खबरदारी म्हणून संगमनेर आगार मधील सर्व बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत.यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत, तर अहमदनगर पोलीसांच्या आदेशाने एसटी महामंडळातील सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती संगमनेर आगार प्रमुख प्रशांत गुंड यांनी दिली आहे.
म विद्यार्थ्यांची हाल होऊ नये म्हणून संगमनेरच्या 25 किलोमीटरच्या अंतर्गत पोलीस स्टेशनच्या आदेशानुसार गाड्या सोडण्यात येत आहे. मात्र लांबपल्याच्या गाड्या बंद असल्याने लांबचा प्रवास करणाऱ्यांनी एस टी महामंडळ चालू आहे की नाही याची खात्री करून प्रवास करावा असे आवाहान एसटी महामंडळ करत आहे.