महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी राजकीय

डोंबिवलीत हिरवा पावसाननंतर आता वाहने व कपड्यांवर काळसर ठिपके, मनसेने प्रदूषण नियंत्रण मंडळाला धरले धारेवर

DESK MARATHI NEWS ONLINE.

डोंबिवली/प्रतिनिधी – काही वर्षापूर्वी डोंबिवली औद्योगिक परिसरात हिरवा पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आता चक्क दोन दिवस डोंबिवलीजवळील एमआयडीसीतील काही भागात पत्र्यांचे शेड, वाहने व कपड्यांवर काळसर ठिपके काळा पडल्याचे नेमके कारण समजू शकले नाही. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेतील गुणवत्ता दर्शविणारे मशीन डोंबिवलीपासून लांब अंतरावर बसवले आहेत. तर विभागाचे कार्यालय कल्याण येथे आहे. डोंबिवलीत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय कां नाही? एकही अधिकारी का दखल घेत नाही? याचा जाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवार 8 तारखेलाजाब विचारण्या करता गेले असता डोंबिवलीत कार्यालय का नाही असा प्रश्न उपस्थित केला.

दोन दिवस डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये काळा पाऊस, काळा रंगाच्या ठिपके पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा माजी आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांच्या सूचनेनुसार पदाधिकारी व मनसैनिकांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला
मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा अध्यक्ष सुदेशजी चुडणाईक, विधानसभा सचिव उदय वेळासकर, अरुण जांभळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष मिलिंदजी म्हात्रे, शहर संघटक तकदिर काळण, हरीष पाटील, शहर सचिव संदीप ( रमा ) म्हात्रे, उपशहर अध्यक्ष श्रीकांत वारंगे,प्रेम पाटील,विभाग अध्यक्ष संजय चव्हाण,रवी गरुड, रक्षीत गायकर, प्रदीप चौधरी, संजय पाटील, कदम भोईर,महिला विभाग अध्यक्षा संगिता खोत पदाधिकारी , उपविभाग अध्यक्ष , महिला व पुरुष शाखा अध्यक्ष व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डोंबिवलीत कार्यालय नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांना एमआयडीसी कार्यालयात बोलावून घेत त्यांना जाब विचारला.आपलं कार्यालय कल्याण मध्ये का? डोंबिवलीकरांना वाऱ्यावर सोडून पालक ठाण्याला आणि अधिकारी कल्याणला अशा प्रकारचे वातावरण या ठिकाणी का असा जाब मनसेने विचारला.आपण आपलं काम योग्यरीत्या व व्यवस्थितपणे पार पाडावी अशी सूचना वजा इशारा यावेळी मनसेने अधिकाऱ्यांना दिला.पुढील दोन दिवसात २४ तास उपलब्ध होतील असे अधिकारी डोंबिवलीमध्ये बसवु व हवेतील गुणवत्ता दर्शवणारा फलक एमआयडीसी परिसरात लावू असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर मनसेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला.

गेल्या वर्षी डोंबिवलीतील एका कंपनीच्या स्फ़ोटाप्रकरणी मंत्री उद्या सामंत हे घटनास्थळी आले असता डोंबिवलीजवळील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर करण्याचाबाबतचा धोरणत्मक निर्णय झाल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र त्यानंतर या निर्णयाचे पुढे काय झाला असा प्रश्न यावेळी मनसे कल्याण जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर यांनी उपस्थित केला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »