DESK MARATHI NEWS.
मुंबई/प्रतिनिधी – उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ११ वर्षांच्या दलित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीच्या संपूर्ण शरीरावर दातांचे निशाण आढळले असून तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव होत असल्याची माहितीही समोर आली आहे. या अमानवी घटनेमुळे मुलीची मानसिक स्थिती अस्थिर झाली आहे.
या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना संतप्त सवाल केला आहे.
“कळायला लागल्यापासून दररोज अशा बातम्या ऐकत आणि वाचत आहे. इतक्या वर्षांत काहीही बदलले नाही. फक्त सत्ताधारी बदलले आहेत, ते इथे डेथ टुरिझम करतात आणि तुम्हाला मूर्ख बनवतात! जर तुम्हाला बदल हवा असेल तर तुमच्या मताचा वापर सुज्ञपणे करायला हवा,” असे सांगून आंबेडकर यांनी म्हटले आहे की, योगी आदित्यनाथ तुमच्या प्रशासनात आणखी किती दलित मुली आणि महिलांना छळ आणि लैंगिक हिंसाचार सहन करावा लागेल?
या घटनेने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.