महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी महत्वाच्या बातम्या

बेजबाबदार पोलिसांवर कारवाई करावी, एकत्र येऊन लढा देऊ – सुजात आंबेडकर

प्रतिनिधी.

पुणे – राज्यात दलितांवरील हल्ल्यात वाढ होत असून हल्लेखोरांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने अशा हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे, त्याला पोलिसही जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी केली आहे.
विराज जगताप याच्या हत्येप्रकरणी अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी विराजच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, राज्यात मागासवर्गीयांवर हल्ल्याचे प्रमाण वाढत असून पोलीस तातडीने कारवाई करीत नाही. त्यामुळे पोलिसांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारची चौकशी न करता अरविंद बनसोड प्रकरणात पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा दाखल करून घेतला. या प्रकरणात आरोपी हे गृहमंत्र्यांचे नातेवाईक असल्याने पोलीस दबावाखाली काम करीत आहेत. तर विराज जगताप प्रकरणात हल्ला झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तो बोलू शकत होता तरीही पोलिसांनी त्याचा जबाब घेतला नाही. भाजपच्या काळात या समाजावर दडपशाही होती. मात्र आघाडी काळात त्यात काहीच सुधारणा झाली नाही. हल्ल्याचे प्रमाण वाढतच आहे. सर्व प्रकरणात मानवाधिकार कार्यकर्ते, पत्रकार, सामाजिक संघटना, वंचित बहुजन आघाडी यांनी आवाज उठवल्यानंतर कारवाई करण्यात आली. अशी माहिती सुजात आंबेडकर यांनी दिली. हल्लेखोरांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने हल्लेखोरांवर कारवाई केली जात नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण ताकदीने, संयमाने पुढे जाऊन लढा द्यायचा आहे, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली

Related Posts
Translate »