महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image आरोग्य लोकप्रिय बातम्या

निरंकारी मिशनने देशभरात लावलेल्या २७२ रक्तदान शिबिरांत जवळपास ५० हजार यूनिट रक्तदान

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – मानव एकता दिवसाच्या निमित्ताने बाबा गुरबचनसिंहजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रविवार,२४ एप्रिल रोजी संत निरंकारी मिशनच्या वतीने संपूर्ण देशामध्ये महा रक्तदान अभियान चालविण्यात आले ज्यामध्ये २७२ रक्तदान शिबिरे लावण्यात आली व जवळपास ५० हजार  यूनिट रक्त संकलित करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये यापैकी ५९ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली.

या रक्तदान अभियानाअंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन, मोठा गाव, डोंबिवली (पश्चिम) येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ३५४ यूनिट रक्त संकलित करण्यात आले. या शिबिरामध्ये डोंबिवली व्यतिरिक्त कल्याण तसेच उल्हासनगर भागातील निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. याशिवाय चेंबूर येथे ८९३ तर नालासोपारा येथे ९१६ यूनिट रक्त संकलित करण्यात आले. अशाप्रकारे मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये एकंदर २१६३ यूनिट रक्तदान करण्यात आले. डोंबिवली येथील शिबिरात रेडक्रॉस रक्तपेढीने १२१ यूनिट, ठाणे सिव्हील हॉस्पिटलने १०० यूनिट आणि सर जे.जे.महानगर रक्तपेढीकडून १३३ यूनिट रक्त संकलित करण्यात आले.

 देशभरात आयोजित करण्यात आलेल्या या महा रक्तदान अभियानाचा शुभारंभ सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथून केला.  याप्रसंगी झूप ॲपच्या माध्यमातून सद्गुरु माताजींनी सर्व शिबिरांना सामूहिक रूपात आपले आशीर्वाद प्रदान करताना म्हटले, ‘‘आपले जीवन सदोदित मानवतेच्या सेवेमध्ये समर्पित राहील या भावनेतून आपण जीवन जगायचे आहे.’’

 सद्गुरु माताजींनी पुढे सांगितले, की बाबा गुरबचनसिंहजी यांचे जीवन व शिकवण यांमधून प्रेरणा घेत आपण मानवतेच्या सेवेमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान द्यायचे आहे. याशिवाय सद्गुरु माताजींनी बाबा हरदेवसिंहजी यांच्या महान शिकवणूकीचाही उल्लेख केला, की रक्तदानाच्या माध्यमातून आपण मानवतेच्या सेवेत बहुमूल्य योगदान देऊन अनेकांचे प्राण वाचवू शकतो. एखाद्या भक्ताला काही कारणाने करता आले नाही तरी रक्तदान करण्याची जी त्याची भावना आहे ती निश्चितच स्वीकार्य आहे.

 युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांनी आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून विश्वबंधुत्व आणि एकोप्याचा संदेश जगभरात दिला. त्याबरोबरच समर्पित गुरु-भक्त महान सेवादार चाचा प्रतापसिंहजी व अन्य भक्तांचेही या दिवशी आपण स्मरण करतो, ज्यांनी मानवतेच्या भल्यासाठी आपल्या प्राणांचेही बलिदान दिले. ‘मानव एकता दिवस’ प्रसंगी मिशनकडून दरवर्षी २४ एप्रिल रोजी संपूर्ण देशात सत्संगाचे कार्यक्रम आयोजित केले जातात शिवाय वर्षभर चालत राहणाऱ्या रक्तदान शिबिरांच्या विशाल श्रृंखलेचाही प्रारंभ केला जातो.

 समालखा येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये सद्गुरु माताजींचे जीवनसाथी आदरणीय रमित चाननाजी यांनी स्वत: रक्तदान करुन मानवतेच्या सेवेमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले आणि सर्वांसाठी प्रेरणास्रोत ठरले.  हे सर्वविदित आहे, की संत निरंकारी मिशन नेहमीच मानवी मूल्यांचे रक्षण करण्यासाठी केलेल्या सेवांबद्दल प्रशंसेस पात्र ठरले असून कित्येक राज्यांकडून सन्मानित केले गेले आहे. जनकल्याणासाठी या सेवा निरंतर जारी आहेत. 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »