महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
पोलिस टाइम्स मुख्य बातम्या

प्रेयसीची क्रूरपणे हत्या करणारा प्रियकर गजाआड

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी मुंबई/प्रतिनिधी – असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं. एकीकडे जात, पात ,धर्म आणि सौंदर्य यांच्या पलीकडे जाऊन अनेक लोक प्रेम (Love) करतात. हेच लोक पुढे जाऊन समाजातील अनेक जोडप्यांचे आदर्श बनतात. पण दुसरीकडे प्रेमाच्या नादात अनेक लोक आपला जीव गमावतात किंवा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात. अलीकडच्या काळात मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार होण्याच्या असंख्य घटना रोज समोर येत आहेत. प्रेमाच्या नादात मुंबईतील एक तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे.

25 एप्रिल रोजी सकाळी पूनम क्षीरसागर या 27 वर्षीय महिलेचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत चिरनेर उरण येथील जंगलातील रस्त्याच्या कडेला ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मानखुर्द पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८ एप्रिल रोजी एक महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांचा तपास सुरू होता. तपासादरम्यान उरणमधील रस्त्यावर सापडलेला मृतदेह बेपत्ता महिलेचा असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या प्रियकरला अटक केले.

मृत महिला पुनम क्षीरसागर हीचे आणि आरोपी निजामुद्दीन अली शेख सोबत चार वर्ष प्रेम सबंध होते. आरोपी निजामुद्दीन याचे आधीच लग्न झाले होते आणि त्याला एक मुलगाही आहे. निजामुद्दीन चे कुटुंब उत्तर प्रदेशमध्ये राहत आहे. पण तो काही वर्षांपासून मुंबईतील नागपाडा परिसरात राहत होता. मृत महिला आणि आरोपी निजामुद्दीन यांच्यात काही कारणावरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होते. या भांडणाने पुढे जाऊन हिंसक वळण घेतले. निजामुद्दीन याने आपली प्रेयसी पुनमची धारदार शस्त्राने हत्या केली. आरोपीने आपल्या कबुली जबाबात पोलिसांना ही माहिती दिली आहे.

उरण पोलिसांनी (Navi mumbai police) दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरुद्ध कलम ३०२ (हत्या) आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर निजामुद्दीन अली शेख याला अटक करण्यात आली. या घटनेत उरण पोलीस विविध बाजूंनी चौकशी करत आहेत. या हत्येत आरोपी निजामुद्दीनसोबत आणखी कोन सहभागी आहे का? याचा पोलिस शोध घेत आहे.

Related Posts
Translate »