महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
न्युजरूम राजकीय

तर आपण भिवंडीच्या विद्यमान खासदारांचा नागरी सत्कार करू – मा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील

DESK MARATHI NEWS NETWORK.

कल्याण/प्रतिनिधी – भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये गेल्या दहा वर्षांत आपण हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली असून विद्यमान खासदारांनी गेल्या वर्षभरात इतकी विकासकामे केली असतील तर ती दाखवून द्यावी, आपण त्यांचा नागरी सत्कार करू अशा शब्दांत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी केलेल्या त्या दाव्याची खिल्ली उडवली.

खासदारकीच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. यावेळी पाटील यांनी दहा वर्षांतील ठळक विकासकामांसोबतच कल्याण मेट्रो, सुभाष मैदान येथील प्रस्तावित इनडोअर स्टेडियम, नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील नामकरण, लोकसभा निवडणूक, भिवंडी – वाडा महामार्गाची दुरावस्था, मराठी – अमराठी वाद, केडीएमसी निवडणूक, स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याण स्टेशन परिसरात रडत खडत चाललेले सॅटीसचे काम आदी महत्त्वाच्या विषयांवर पत्रकारांशी सखोल संवाद साधला.

एखादी व्यक्ती जर खरोखर विकास करत असेल तर ती कोणत्या पक्षाची आहे हे महत्त्वाचं नाहीये. जनतेच्या हिताचं काम जर कोणी खरंच करत असेल आणि ती कामं त्यांनी आपल्याला दाखवली तर आपण आपल्याला त्याबाबत कोणताही आकस असू नये. गेल्या दहा वर्षात आपण कमीत कमी 28 ते 29 हजार कोटीची विकासकामे मंजूर केली असून ही सर्व कामे सुरू असल्याचे आपल्याला दिसून येईल. आणि ते म्हणत आहेत की इतकी सर्व कामे आपण एका वर्षांत केली असे सांगत आहेत, तर आपणही त्यांना विचारले पाहिजे की तुम्ही केलेली दोन चार कामे तरी दाखवा असे सांगत कपिल पाटील यांनी नाव न घेता विद्यमान खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्यावर टीका केली.

भिवंडी शहरातील मेट्रोचे सुमारे 85 टक्के काम पूर्ण झाले असून कल्याणकडे येणारी मेट्रो ही तत्कालीन आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे रखडल्याची टीकाही पाटील यांनी यावेळी केली. भिवंडी आणि कल्याण या दोन्हीकडील बदललेल्या डीपीआरला मान्यता देण्याकडे आघाडी सरकारने साफ दुर्लक्ष केल्यानेच कल्याण मेट्रो रखडल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दोन्ही डीपीआर मंजूर केले असून आता लवकरच या कल्याण मेट्रोच्या कामाला सुरुवात होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राजमाता जिजामाता यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे तर उभा महाराष्ट्र घडवण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आदराचे, श्रद्धेचे स्थान आहे. मात्र एखादी ठेकेदार संस्था या जिजामाता यांचे नाव वापरून भ्रष्टाचार, बोगस काम करत असतील तर त्यांना हे नाव वापरू न देण्यासाठी राज्य सरकारने कार्यवाही केली पाहिजे असे सांगत कपिल पाटील यांनी जिजाऊ संघटना आणि या संस्थेचे प्रमूख निलेश सांबरे यांच्या कारभारावर नाव न घेता ताशेरे ओढले. बहुचर्चित भिवंडी – वाडा रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला असून अनेकाना अपंगत्व आले आहे, अनेक सामाजिक संस्थांनी या रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आंदोलनेही केली आहेत. तसेच या सर्व कारभाराबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून योग्य वेळी त्याची चौकशी सुरू होईल असा सूचक इशाराही कपिल पाटील यांनी यावेळी दिला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »