महत्वाच्या बातम्या

इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्तलाखोंचा गुटखा जप्त मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरारटँकरचे पाणी घेण्यासाठी नागरिकांची मैलभर पायपीटफेक आंतरराष्ट्रीय फोन कॉल ब्लॉक करण्यासाठी सरकारने दिले निर्देश
ठाणे न्युजडेस्क

अंबरनाथमध्ये वीज ग्राहकांच्या ३० तक्रारींचे निवारण सेवा पंधरवाड्यानिमित्त शिबीराचे आयोजन

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी – सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने अंबरनाथमध्ये वीज ग्राहकांच्या समस्यांसाठी आयोजित शिबीरात ३० तक्रारींचे निवारण करण्यात आले. महावितरणच्या अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम उपविभागातील ग्राहकांसाठी शुक्रवारी (०९ मे) या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

२८ एप्रिल ते १२ मे दरम्यान सेवा हक्क पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषत: नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीज बिलावरील नावात बदल तसचे विविध प्रकारच्या तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार अंबरनाथमध्ये ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी शुक्रवारी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात नवीन वीजजोडणीचे १०, वीज बिलावरील नावात बदल करण्याबाबतचे ८ आणि वीज बिलासंदर्भातील १२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा व उल्हासनगर विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण चकोले यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर आयोजित करण्यात आले. अंबरनाथ पूर्व व पश्चिम उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनुक्रमे जितेंद्र प्रजापती आणि अलका कावळे यांच्या नेतृत्वाखाली अभियंते, कर्मचाऱ्यांनी हे शिबीर यशस्वी केले.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »