महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
कृषी

कृषी विभागाविरोधात वंचितचा एल्गार, वितरकांवर कारवाईची मागणी

प्रतिनिधी.

परभणी – बोगस सोयाबीन शेतकऱ्यांच्या माथी मारून प्रचंड माया जमविल्यानंतर आता वितरकांनी कारवाई होऊ नये म्हणून बंदचे हत्यार उपसले आहे. तर दुसरीकडे कृषी विभागाने  कारवाईच्या नावाखाली वेळकाढूपणा केला आहे. त्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन वितरकांवर कारवाईची मागणी केली आहे.
परभणी जिल्ह्यात बोगस बियाणांमुळे एक हजार चारशे तक्रारी दाखल झाल्या आहेत. याबाबत केवळ पंचनामा करण्याच्या पलीकडे काहीही कारवाई कृषी विभागाने केली नाही. अशा बोगस बियाणे विकणाऱ्या विरोधात औरंगाबाद खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले असल्याचे वंचितचे राज्य समन्वयक डॉक्टर धर्मराज चव्हाण यांनी सांगितले. कृषी अधिकार्‍यांचे व्यापारी प्रेम पाहता कारवाई केली जात नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक, जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, गुण नियंत्रण विभाग व सरकारची प्रमाणित बियाणे मार्गदर्शक तत्व असताना असे बोगस बियाणे विक्रीसाठी कसे येतात हा एक गहन प्रश्न आहे. याचा अर्थ असा की कृषी विभाग व वितरक यांच्या मध्ये अर्थपूर्ण व्यवहार होत असावा किंवा वितरक कृषी विभागाला गृहीत धरीत नसावे असा आरोपही चव्हाण यांनी केला आहे. यापुढे शेतकऱ्यांना बोगस बियाणे, फवारणी औषधे, खते यांची बोगस विक्री केल्यास वंचित स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

Related Posts
Translate »