महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे – सुप्रिया सुळे

नेशन न्यूज मराठी टीम.

बारामती / प्रतिनिधी – महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या धामधूम सुरु असताना संसदेची विशेष बैठक पार पाडून आपल्या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे परतल्या आहेत. आपल्या मतदारसंघातील अनेक गणपती मंडळांना त्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तेव्हा त्या म्हणाल्या, गणरायाचा आगमन झालं तेव्हा पार्लमेंट सुरू होतं, आज मी अनेक गणपतीच्या मंडळांना भेट दिली. गणरायांना साकडे घालत महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळू दे. अशी प्रार्थना देखील केली .

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची गाडी अडवली गेली या घटनेवर त्या म्हणाल्या कि देवेंद्रजी हे लोकप्रतिनिधी आहेत. आणि त्यांची गाडी अडवली जाणे हे दुर्दैवी आहे. ही वेळ कोणावरही येऊ शकते. त्यामुळे कोणत्याही पक्षातील नेता असो,त्याच्याकडे न्याय मागायचा अधिकार आहे. पण ते माझे राजकीय विरोधक असले तरी आपण नागपूरच्या मदतीस गेले पाहिजे.

विद्यमान सरकारने देश विकासासंदर्भात जी कामे केली आहेत त्याबाबत त्यांनी मत व्यक्त केले. तेव्हा त्या म्हणाल्या, भारतीय जनता पार्टी हा पक्ष घरे फोडणे व पक्ष फोडणे या केंद्रीय यंत्रणांमध्ये इतके मग्न असतात कि, त्यांना विकास करण्यासाठी वेळ नसतो. नागपूरमध्ये महिलांवर झालेल्या हल्ल्याबाबत फारशी माहिती नसल्याचे सांगत त्या म्हणाल्या, देवेंद्र फडवणीस यांच्याकडे असणारा वेळ त्यांनी घर फोडण्यात व पक्ष फोडण्यात दिला नसता तर नागपूर सारखा प्रकार घडला नसता.

सध्या राज्यात व बारामती मध्ये महागाई,दुष्काळ बेरोजगारी याबाबत मोठी आव्हाने आहेत. देशाच्या सुरक्षितेचा विषय आहे यामध्ये मणिपूरचा प्रकार अजून थांबताना दिसत नाही.कॅनडा ने भारतावर आरोप केलेला आहे.एवढी सगळी आव्हाने असताना भारतीय जनता पार्टी कट कारस्थानात मग्न आहे. याचे त्यांना आश्चर्य वाटत नाही. असे त्या म्हणाल्या.

केंद्राने अचानक एक बैठक बोलावली यामध्ये मोठी कर्जमाफी होईल, शेतकऱ्यांना दिलासा देणारा काहीतरी होईल, दुष्काळ बेरोजगारी आणि महागाईच्या परिस्थितीवर काही चर्चा होईल. असे वाटले होते पण अस प्रत्यक्षात काही झाल नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

महिला विधेयकांबाबत आम्ही सरकारसोबत ठामपणे उभे राहिलो. मात्र ही गोष्ट पोस्ट डेटेड चेक असल्याचं समजून आलं, याच्यावर तारीख नसलेलं आढळून आलं. ही महिलांची मोठी फसवणूक असल्याचे लक्षात आलं. सातत्याने महिला खासदार बोलत असताना भाजप चे नेते महिलांच्या विरोधात बोलायला सुरुवात करीत होते. त्यांना वाईट वागणूक देत होते. असा अनुभव त्यांनी सांगितला.

पंतप्रधान मोदी हे जरी वेगळ्या पक्षाचे असले तरी काही गोष्टींबाबत त्यांना समर्थन दिले जातेय. परंतु भाजपमध्ये नक्की जे काही सुरु आहे त्याबाबत मोठा प्रश्न आहे असे त्या म्हणाल्या तसेच भाजप हा पक्ष नसून तो जुमला पक्ष आहे असे जे उद्धव ठाकरे म्हणतात ते सत्य असावे असेही त्या म्हणाल्या.

नवी दिल्ली येथील नव्या संसदेच्या वास्तूत बैठकीला उपस्थित राहिलेल्या सुप्रीया ताई यांना अजूनही जुनी संसद भवन इमारत आवडत असून जुन्या संसदेत देशाचा सगळा इतिहास आहे.तिथल्या भिंती बोलक्या आहेत. तिथे मोठ्या नेत्याच्या स्वातंत्र्याचा लढा होता, माझी या वास्तू सोबत इमोशनल अटॅचमेंट आहे, म्हणत त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील नागरिकांचे आभार मानले कि ज्यामुळे मोठ्या लोकांना त्यांना भेटता आलं. हा अनुभव त्यांना जुन्या संसदेत घेता आला म्हणत नव्या संसदेत मोठ्या अपेक्षेने गेले असल्याचे त्या म्हणाल्या.

जालना येथील मराठा क्रांती आरक्षण आंदोलनातील उपोषणकर्त्या कार्यकर्त्यांवर झालेल्या लाठीमार घटनेचा त्यांनी निषेध व्यक्त करत , धनगर व मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचे त्या म्हणाल्या. पाच दिवसीय बैठकीमध्ये धनगर आरक्षण महागाई बेरोजगारी व इतर मुद्द्यांबाबत चर्चा करायला हवी होती मात्र तशी ती घडली नसल्याचे त्या म्हणाल्या.

भारत हा लोकशाही असलेला देश आहे. मात्र स्वतःच्या स्वार्थासाठी इथे जुमलेबाजी केली गेली त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या पदरात काही पडलं नाही. आपल्याकडे लोकशाही आहे मात्र दिल्लीत लोकशाही चालते की नाही ? हे पूर्ण देश बघतो. लोकशाहीच्या निर्णयानुसा कोणीतरी विरोधात लढलेच पाहिजे याचा मी स्वागत करते. विधानसभा अध्यक्षांना फटकारले गेले आहे. ज्याच्या विरोधात बोललं की काहीतरी कटकारस्थान ते करतात. सत्तेचा गैरवापर कसा करायचा असतो आणि दडपशाही कशी वाढवायची असते याचे हे आणखी एक जिवंत उदाहरण असल्याचे सुप्रियाताई म्हणाल्या.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »