महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे ताज्या घडामोडी

कल्याणात मेळ्याच्या गणपतींचे विसर्जन मोठ्या उत्साहात

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – गेल्या शतकाहुन अधिक काळा पासून कल्याण गावातील मेळा गणपतीची परंपरा अद्यापही अखंडित सुरू असून यामेळा गणपतीचे विसर्जन एकादशीच्या दिवशी मोठया भक्ती भावाने करण्याची प्रथा आहे .कल्याण गावातील मेळा गणपतीच्या विसर्जना साठी मिरवणुका ढोल ताशाच्या गजरात ठरवून दिलेल्या मार्गाने गणेश घाटावर मार्गस्थ होऊन बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जात होता.लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर दुसऱ्याच वर्षी कल्याणच्या सुभेदार वाड्यात १८९५ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करण्यात आली.

त्या काळी देशप्रेमाने भारलेल्या तरुणांची एवढी मोठी संख्या कल्याणात होती की, समाजामध्ये देशप्रेम वाढीस लागावे यासाठी त्यानंतरच्या काळात वाणी, तेली, चांद्रसेनी कायस्थ प्रभू, खाटीक मंडळी, धनगर, पांचकळशी, गुजराथी, मराठे मंडळी वगैरे मंडळांनी आपआपल्या समाजातर्फे हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी मेळ्याच्या स्वरूपात सुरू करण्यात आलेल्या या उत्सवाची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेला कल्याण शहरात प्रचंड महत्त्व आहे. गणेशोत्सवात आकर्षक सजावट आणि देखावे करण्यात कल्याणातील मंडळे आणि कार्यकर्ते मागे नसायची. पण मुंबई, पुण्यातील गणेशोत्सव देखाव्यांचे कौतुक त्यांनाही असे.अर्थात मंडळाचा गणेशोत्सव असल्याने मुंबई, पुण्यातील देखावे पाहण्यासाठी जाणे शक्य नसायचे. अशा स्थितीत येथील काही मंडळांनी एक नामी शक्कल काढली. एकादशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे विसर्जन करून उरलेले दोन दिवस मुंबई-पुण्यातील गणेशदर्शनाला निघायचे, अशी परंपराच कल्याणमध्ये सुरू झाली.

अशा एकादशीच्या दिवशी विसर्जन करणाऱ्या मंडळांच्या गणरायांना ‘मेळय़ाचे गणपती’ असे संबोधले जाऊ लागले. इतरत्र सहसा कुठे न आढळणारी एकादशीच्या विसर्जनाची परंपरा कल्याण मध्ये सुरू आहे.या गणपतींचे विसर्जन एकादशीच्या दिवशी केले जाते. प्रत्येक गणपतीचा मान ठरलेला आहे. मात्र काळाच्या ओघात अनेक मंडळे या मेळ्यातून बाहेर पडली असली तरी आजही १२ मंडळांचा मेळा गणेशोत्सव मंडळात समावेश आहे. हे सर्व गणपती आपापल्या मानाप्रमाणे विसर्जन मिरवणुकीत सहभागी होतात. प्रत्येकाचे नंबर ठरवून दिलेले असून त्या नंबरचा गणपती विसर्जनासाठी निघाल्यानंतर त्यापुढील गणपती या रॅलीत सहभागी होत असतात.

अत्रे रंगमंदिराकडून निघडलेल्या या विसर्जन मिरवणुकीत तेली मंडळी, वैश्य समाज मंडळ, धनगर समाज मंडळ, शाहू छत्रपती गणेशोत्सव मंडळ, नवजीवन गणेशोत्सव मंडळ, उदय गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ, बच्चीराम तेली गणेश मंडळ, कुंभारवाडा गणेश मंडळ, गुजराती समाज मंडळ, हनुमान प्रासादिक गणेशोत्सव मंडळ, गजानन प्रासादिक मंडळ या १२ गणपतींचा समावेश असून या गणपतीच्या मिरवणुका ढोल ताशाच्या गजरात ठरवून दिलेल्या मार्गाने गणेश घाटावर मार्गस्थ होत होते . शेवटच्या गणपतीचे विसर्जन दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत चालते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »