महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image चर्चेची बातमी ठाणे

पाच दिवसातील संततधार पर्जन्यवृष्टीने मोरबे धऱणाच्या पातळीत लक्षणीय वाढ

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई – स्वत: च्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्पामुळे जलसमृध्द शहर अशी नवी मुंबईची ओळख आहे. यावर्षी खूप उशीरा पावसाळी कालावधी सुरु झाल्याने काही शहरांनी पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेने असा निर्णय न घेता नागरिकांना दिलासा दिला होता. त्याच वेळी इतर शहरातील पाणी टंचाई लक्षात घेता पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने नागरिकांना करण्यात आले होते. नवी मुंबईकर नागरिकांना पाणी पुरवठा करणा-या महानगरपालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पात 3 तारखेला 27.34 टक्के म्हणजेच 31 ऑगस्टपर्यंत पुरेल इतका जलसाठा होता. 4 जुलै पासून मोरबे धरण पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्यास सुरुवात झाल्याने जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली.

4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत 5 दिवसात 606.80 मि.मि. इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने मोरबे धऱणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून 52.20 एम.सी.एम. पाणीसाठा पाचच दिवसात 70.02 एम.सी.एम. इतका झालेला आहे. म्हणजेच मोरबे धरणातील जलसाठ्यात 17.82 एम.सी.एम. इतकी वाढ झालेली आहे. संततधार पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा 36.68 टक्के इतका झालेला असल्याने पाच दिवसात झालेली 9.34 टक्के इतकी लक्षणीय वाढ नवी मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. सद्यस्थितीत 5 डिसेंबर 2022 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा मोरबे धऱणात झालेला आहे. मोरबे धऱणाची पाण्याची पातळी 3 जुलै रोजी 69.84 मीटर इतकी होती, ती मागील पाच दिवसातील पावसामुळे 73.10 मीटर इतकी झालेली आहे. 88 मीटर ही मोरबे धरणात पाणी साठविण्याची कमाल क्षमता असून अशाच प्रकारे पाऊस पडल्यास मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही मोरबे धरण संपूर्ण भरेल असे दिसून येत आहे.

मान्सुनची परिस्थिती लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची पाणी कपात केली नाही. मात्र पाण्याचे महत्व लक्षात घेऊन सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचा अपव्यय करू नये असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »