महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी शिक्षण

जालंधर येथील दोआबा महाविद्यालयाचा ६५ वा दीक्षांत समारंभ संपन्न

नेशन न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली/प्रतिनिधी – आपल्या देशातील युवा पिढीच्या प्रतिभेचा अनाठायी वापर होण्यापासून वाचविले पाहिजे आणि त्यांना अधिकाधिक प्रमाणात प्रतिभा प्राप्त करण्यासाठी सक्षम केले पाहिजे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, केंद्र सरकारने संपूर्ण जगाला डिजिटल भारत मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करून दाखविली आहे आणि त्यामुळे आता देशातील अधिकाधिक आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने किंवा यूपीआय प्रणालीच्या माध्यमातून केले जात आहेत.

जालंधरच्या दोआबा महाविद्यालयातील वरिंदर सभागृहात आज झालेल्या 65व्या दीक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या प्रसंगी ते पुढे म्हणाले की, 34 वर्षांच्या कालावधीनंतर नव्या शैक्षणिक धोरणाची सुरुवात करून क्रीडा, शिक्षण, कौशल्य विकास आणि प्रादेशिक भाषेत शिक्षण या क्षेत्रांमध्ये केंद्र सरकारने क्रांतिकारी पावले उचलली आहेत. ’स्किल इंडिया’ कार्यक्रमातून देशातील युवकांना रोजगाराच्या कमाल संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत आणि सॉफ्ट स्कील्सच्या बाबतीत विशेष लक्ष पुरवून या युवकांना देशात तसेच परदेशात उत्तम कारकीर्द घडविण्याच्या अगणित संधी मिळवून दिल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.

दीक्षांत समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मंगळवारी समारंभाला उपस्थित राहिलेले केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले की आजचे युग हे महिला सशक्तीकरणाचे युग आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रात, विशेषतः शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांमध्ये महिला करून दाखवत असलेली कामगिरी हा त्याचा पुरावा आहे आणि आजच्या बदलत्या भारताचे हे आदर्श चित्र आहे. आणि हा बदल घडण्यापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था जगात 11व्या क्रमांकावर होती, आता ही परिस्थिती बदलली आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. देशाच्या सर्व क्षेत्रांतील लोकांनी, मग ते श्रीमंत असो वा गरीब, सर्वांनीच यशस्वी डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून देशाचे डिजिटल भारत होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले आहे आणि त्याबद्दल सर्व देशवासीय अभिनंदनास पात्र आहेत.

या कार्यक्रमापूर्वी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात काही रोपे देखील लावली.

दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन यांच्या पवित्र नित्यविधीने दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. पाहुण्यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ.प्रदीप भंडारी म्हणाले की अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीमुळे आज दोआबा महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना अभिमान वाटत आहे आणि ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. श्री.चंद्र मोहन, श्री.अविनाश कपूर, डॉ.सुषमा चावला, प्रा.प्रदीप भंडारी यांनी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांना विशेष दोआबा पारितोषिक आणि दुशाला देऊन त्यांचा सन्मान केला.

दोआबा महाविद्यालयाचे अत्यंत हुशार आणि प्रतिभावंत माजी विद्यार्थी अनुराग सिंह ठाकूर यांच्या असामान्य कर्तृत्वामुळे आज संपूर्ण दोआबा महाविद्यालय परिवाराला त्यांचा अत्यंत अभिमान वाटत आहे असे चंद्र मोहन यांनी सांगितले. ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी जीवनात मोठी उंची गाठलेल्या ठाकूर यांच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »