महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
ताज्या घडामोडी शिक्षण

कल्याणच्या कचरावेचक कुटूंबातील 5 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मारली बाजी

DESK MARATHI NEWS.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडवर काम करणाऱ्या कचरावेचक कुटुंबातील 5 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत मुख्य प्रवाहाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. गौरी सोनवणे (63 टक्के), श्रद्धा सोनवणे (65 टक्के), अर्चना घुले (51टक्के), कुणाल उकांडे (60 टक्के) आणि दीपक जगताप (46 टक्के) अशी या पाच विद्यार्थ्यांची नावे आहेत. या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या एक दशकांहून अधिक काळ मेहनत घेणाऱ्या अनुबंध संस्थेशी हे विद्यार्थी जोडले गेले आहेत.

पूर्वापार चालत आलेली घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती. शिक्षण तर दूर साधे एकवेळचे जेवणही मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष अशी भयानक परिस्थिती असतानाही या मुलांनी मिळवलेले हे गुण म्हणजे 100 टक्क्यांहून अधिक सरसच. एकीकडे आपण समाजात पाहतो की आपल्या मुलासाठी आई वडील काय हवं, काय नको, चांगली शाळा, चांगला क्लास असं सगळं काही देण्याचा प्रयत्न करतात.

तर दुसरीकडे या कचरावेचक मुलांच्या घरची एकदम त्याउलट परिस्थिती. मुलाला काही तरी देण्याची इच्छा असूनही पोटाच्या भुकेपुढे आपल्या पोटच्या गोळ्याकडे त्यांना नाईलजातव दुर्लक्ष करावं लागतं. मात्र या गोष्टीचं कोणतेही भांडवल न करता या पाच विद्यार्थ्यांनी जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आज हे यश प्राप्त केलं आहे.

मुख्य प्रवाहात येण्यासाठी, मुख्य प्रवाहात जोडलं जाण्यासाठी त्यांचे हे पहिलेच पाऊल. त्याबद्दल गौरी सोनवणे (63 टक्के), श्रद्धा सोनवणे (65 टक्के), अर्चना घुले (51टक्के), कुणाल उकांडे (60 टक्के) आणि दीपक जगताप (46 टक्के) या पाचही जणांचे करावे तितके कौतुक कमीच ठरेल. या पाचही जणांच्या जिद्दीला आणि त्यांच्या मनामध्ये ही जिद्द निर्माण करणाऱ्या अनुबंध संस्थेला मनापासून सलाम.

 

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »