महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे महत्वाच्या बातम्या

कल्याण येथील लोकन्यायालयात १९५१ प्रकरणे निकाली

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – शनिवारी कल्याण तालुका विधी सेवा समितीतर्फे राष्ट्रीय लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये एकुण ७६२४ दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटूंबिक वाद प्रकरणे, चेक संबधीची फौजदारी प्रकरणे, बॅक वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वीजबीलासंदर्भातील प्रकरणे तसेच न्यायालयात वाद दाखलपुर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. यापैकी एकुण १९५१ दिवाणी व फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आले असुन त्यात एकुण रु. ६,२१,८१,०१३/- ची रक्कम नुकसान भरपाई, वीज बिल वसुली, बँकांची ऋण वसुली इत्यादी म्हणून संबधीतास अदा करण्यात आलेली आहे.

या लोकन्यायालयात मोठया संख्येने पक्षकार, अधिकारी, इन्सुरन्स कंपन्याचे अधिकारी, वाहतुक शाखेचे अधिकारी व वीज वितरण कंपनीचे अधिकारी हजर होते. वीजबिल बाबतच्या एका फौजदारी प्रकरणात ४ हजार ६०० रुपये  भरणे आवश्यक होते. परंतु या प्रकरणातील पक्षकार स्त्री ही गरीब असल्यामुळे तिच्याकडे फक्त रक्कम ३ हजार ५०० रुपये होते. उर्वरित रक्कम जिल्हा न्यायाधीश राजीव पांडे, शिवाजी कचरे, वीज वितरण कंपनी अधिक्षक अभियंता डी आर पाटील व दिलीप भोळे व वकील महेश बोरूडे यांनी अदा केल्यामुळे सदर प्रकरण निकाली काढण्यात आले.

हे लोकन्यायालय यशस्वी केल्याबद्दल जिल्हा न्यायाधीश – १ तथा कल्याण तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष राजीव पी. पांडे यांनी सर्व पक्षकार, लोकन्यायालयात सहभागी झालेले वीज वितरण, इन्शुरन्स, बॅक वाहतुक शाखेचे अधिकारी, न्यायीक अधिकारी, विधीज्ञ व न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »