महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
देश मुख्य बातम्या

नावेमधून 600 कोटींच्या ड्रग्सची तस्करी करणारे 14 जन जेरबंद

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – देशाच्या सागरी सुरक्षेसाठी तटरक्षक दल नेहमीच तत्पर असतात. त्यांचे समुद्रातील प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष्य असते. त्यामुळे तस्करी करणाऱ्या अनेक टोळ्या आजवर जेरबंद झाल्या आहेत. यावेळी एटीएस आणि एनसीबी यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी तब्बल 600 कोटी रुपयांचे ड्रग्स नेणारी नाव ताब्यात घेतली आहे.

भारतीय तटरक्षक दलाने दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि अमली पदार्थ नियंत्रण संस्थेच्या (एनसीबी) सहयोगाने 28 एप्रिल 2024 रोजी नियोजनपूर्वक आखलेल्या कारवाईत एका पाकिस्तानी नावेवरून 600 कोटी रुपये किमतीचे 86 किलो अमली पदार्थ जप्त केले आणि नावेवरून 14 जणांना ताब्यात घेतले. शोध यंत्रणेला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित बोटीचा, भारतीय तटरक्षक दलाच्या राजरतन या सुसज्ज जहाजावरील एटीएस आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छडा लावला. राजरतन जहाजाने, जहाजांचा ताफा आणि विमानाच्या मदतीने, अमली पदार्थांनी भरलेल्या या जहाजाला निसटण्याची कोणतीही संधी मिळू दिली नाही. जहाजावरील विशेष पथकाने संशयित बोटीचा ताबा घेतला. त्यानंतर कसून तपासणी केल्यावर नावेत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ असल्याचे आढळून आले. पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

भारतीय तटरक्षक दल आणि दहशतवादविरोधी पथकाने एकत्र येऊन गेल्या तीन वर्षांत अशा प्रकारच्या अकरा यशस्वी मोहिमा राबवल्या असून, यामधून राष्ट्रीय उद्दिष्टांप्रति त्यांच्यामध्ये असलेला समन्वय दिसून येत आहे. त्यामुळेच भारतातील सागरी किनारपट्टीवर होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसू शकला आहे.

Related Posts
Translate »