महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कृषी लोकप्रिय बातम्या

कल्याण परिमंडलात नव्या धोरणातून कृषिपंपाच्या १३ टक्के थकबाकीचा भरणा तर ७१ कृषिपंपांना नवीन वीज जोडण्या

    कल्याण प्रतिनिधी – कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकीत पन्नास टक्के सवलत व नवीन वीजजोडणीसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘कृषिपंप वीजजोडणी धोरण-२०२०’ला कल्याण परिमंडलात वाढता प्रतिसाद मिळत आहे. भेंडीचे आगार म्हणून ओळख असलेल्या खांडपे गावात (ता.मुरबाड) गुरुवारी अकरा शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या चालू बिलासह थकबाकीची २ लाख ७२ हजार रक्कम रोख स्वरूपात मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्याकडे सुपूर्द केली.  तर या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत चालू बिलासह एकूण थकबाकीपैकी १३ टक्के थकबाकीचा भरणा झाला असून सर्वच शेतकऱ्यांना योजनेत सहभागी करून घेण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

    कल्याण परिमंडलात ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकूण २३ हजार ५८९ कृषिपंप ग्राहक असून त्यांच्याकडे २८ कोटीचें वीजबिल थकीत आहे. योजनेतील तरतुदींमुळे एकूण थकबाकीपैकी २ कोटी २१ लाख रुपये माफ झाले आहेत. आता परिमंडलातील शेतकऱ्यांकडे २५ कोटी ७७ लाख रुपयांच्या एकूण थकबाकी आहे. त्यापैकी केवळ पन्नास टक्के म्हणजेच १२ कोटी ८८ लाख रुपये चालू वीजबिलासह एकरकमी भरल्यास उर्वरित पन्नास टक्के थकबाकी माफ होणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत चालू वीजबिलासह थकबाकीच्या २ कोटी ३५ लाख रुपयांचा भरणा करून महावितरणला तत्पर प्रतिसाद दिला. याशिवाय मार्च-२०१८ नंतर पैसे भरून प्रलंबित असलेल्या दोन्ही जिल्ह्यातील ७१ कृषिपंपांना या योजनेतून नवीन वीज जोडणी देण्यात आली.

    खांडपे येथे आयोजित मेळाव्यात अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तावाडे, कार्यकारी अभियंता राजीव रामटेके, उपकार्यकारी अभियंता सुरेश सुराडकर यांनीही योजनेबाबत माहिती देऊन सहभागी होण्याचे आवाहन केले. तर सरपंच अक्षता वाघचौरे व उपसरपंच रवींद्र रसाळ यांनी गावातून वसूल होणाऱ्या कृषिपंप थकबाकीतील ३३ टक्के रक्कम गावातील वीज वितरण यंत्रणेवर खर्च होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच खांडपे ग्रामपंचायतीला थकबाकी वसुली केंद्र म्हणून मंजुरी व त्यातून मिळणारे उत्पन्न याचाही मोठा लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खांडपे पंचक्रोशीतील कृषिपंप ग्राहक, ग्रामस्थ, महावितरणचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  

    Related Posts
      Translate »