नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक / प्रतिनिधी – अंतरवाली या ठिकाणी मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला असून ठीक ठिकाणी याचे पडसाद उमटताना दिसत आहेत.
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालय समोर स्वराज्य संघटनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली लाठीमार करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करावे आणि दोषींवर कडक कारवाई केली नाही तर मराठा समाज हा आक्रमक होईल आणि पूर्ण महाराष्ट्र बंद पाडेल अशा भावना आंदोलन कर्त्यांनी मांडल्या आहे.
Related Posts