महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

हुतात्मा जवान वैभव वाघ यांना शोकाकुल वातावरणात गावकऱ्यांनी दिला निरोप

 

जळगाव/प्रतिनिधी – नदीत बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पाण्यात उतरलेल्या एसडीआरएफ च्या पथकावर काळाने घात केला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सुगाव गावाजवळ गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. प्रवरा नदीत बोट उलटल्याने तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मुंबई येथून मदतकार्यासाठी आलेल्या टीममधील तीन जण व स्थानिक दोन जण अशा पाच जणांचा मृतांमधे समावेशआहे.

या घटनेत जळगाव जिल्ह्यातील भडगाव गावातील वैभव वाघ यांना वीरगती प्राप्त झाली. एसडीआरएफच्या बचाव कार्यात हुतात्मा झालेले वीर जवान वैभव सुनील वाघ यांना आज शासकीय इतमामात आणि अत्यंत शोकाकुल वातावरणात अंतिम निरोप देण्यात आला. याप्रसंगी तालुक्यातील मान्यवर आणि प्रशासकीय अधिकार्‍यांसह परिसरातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. माजी सैनिक व त्रिदल सेना अध्यक्ष आबासाहेब गरुड यांनी हुतात्मा जवान वैभव वाघ यांची पुतळ्याची गावात मागणी केली, असून गावात लवकरच पुतळ्याचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

शहीद वैभव वाघ हे पांढरद तालुका भडगाव येथील रहिवासी आहे. त्यांचे शिक्षण भडगाव येथे झाले. वैभव यांचा जन्म झाल्याच्या अवघ्या 17 दिवसानंतरच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या डोक्यावरून पितृछाया हरपली. वैभव वाघ यांच्या आईनेच काबाडकष्ट करून त्यांचे पालन केले. पण आता त्यांच्या निधणानंतर आई संगीताबाई वाघ व पत्नी शितल वाघ ह्यांचा आधारस्तंभ हरपला आहे. तसेच वैभव वाघ यांच्या जाण्याने सहा वर्षाचा मिताशू व तीन वर्षाचा ऋतिक ह्या दोन्ही मुलांचे छत्र हरपले आहे. वाघ कुटुंबावर आलेल्या अचानक संकटाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

Related Posts
Translate »