महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image राजकीय

वाढत्या महागाई विरोधात सांगलीत वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर

नेशन न्यूज मराठी टीम.

सांगली/प्रतिनिधी – गेली अनेक वर्ष देशामध्ये व महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येप्रमाणे शासकीय नोकर भरती केली नाही. जनतेला रोजगार उपलब्ध करुन दिला नाही. तसेच महागाईचा डोंगर जनतेच्या डोक्यावर ठेवणे चालूच आहे. त्यामुळे लोकांनी कॉंग्रेसचे सरकार उलथवून टाकले व भाजपाने त्या काळामध्ये मोठ मोठी आश्वासने दिले होते. परंतु भाजपाने देश विकावयास काढला आहे. लोकांना लोकसंख्ये प्रमाणे नोकर भरती नाही. भांडवलशहाना खाजगीकरणाच्या नावाखाली सावकार करुन इथल्या शासकीय नोकऱ्या संपविणेचे काम भाजप सरकार करीत आहे. असे म्हणणे मांडत वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी सरकारवर टीका केली.

तसेच विज दरवाढ, जिवनावश्यक वस्तुची झालेली दरवाढ, गॅसदर वाढ, पेट्रोल दरवाढ त्यामुळे भारतातील जनता होरपळून निघत आहे. पेट्रोलचे दर १०७ रू. लिटर तर गॅसचा दर १,१२० रुपयांना मिळत आहे. आम्ही महागाई कमी करु व गोर गरीब जनतेला न्याय देणेचा प्रयत्न करु असे आश्वासन देवून गोरगरीब जनतेची फसवणूक करुन गोरगरीब भाबड्या मतदारांनी महागाई कमी होईल, असे समजुन भारतीय जनता पार्टीला भरघोस मते दिली मात्र गेली १० वर्षे हे सरकार सत्तेवर असुन कॉंग्रेसच्या काळात जेवढी महागाई होती त्या पेक्षा दुप्पट, तिप्पट महागाई भारतीय जनता पार्टीच्या राज्यात झालेली आहे. तरी लवकरात लवकर महागाई नियंत्रणात आणून जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करावेत व सर्वसामान्य माणसाला दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी केली.

यावेळी जिल्हा सचिव राजू मुलानी, रहिमभाई कवठेकर, चंद्रकांत खरात, सतिश शिकलगार, अनिल अंकलखोपे, नाझिर झारी, सिद्धार्थ लोंढे, आम्रपाली लोंढे, प्रमोद मल्लाडे, अतिश कांबळे, मिलिंद कांबळे, सागर आठवले, विशाल लोंढे, सूरज वाघमारे, दिपक कांबळे, मानतेश कांबळे, किशोर आढाव, आनंदसागर पुजारी, महेश कुरणे, अमोल साबळे, वहिदा कडलास्कर, यासीन कडलास्कर, चंद्रकांत कोलप,दत्ता आठवले, भाऊसाहेब कोळी, राजू बेग, जमीर जामदार, राहुल धोतरे, धम्मदिप कांबळे, महावीर पाटील, गौतम लोटे, संतोष कांबळे, आकाश जाधव इ. बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »