महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
करियर चर्चेची बातमी

यूपीएससी परीक्षेत नवी मुंबईतील वैशाली कांबळे ने मारली बाजी

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

ठाणे/प्रतिनिधी – जगातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक यूपीएससी परीक्षा आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी ही परीक्षा देतात आणि काही निवडक विद्यार्थीच यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या या परीक्षेत नवी मुंबईची वैशाली कांबळे हिने देशभरातून 310 वा क्रमांक पटकावला असून नवी मुंबईतून उत्तीर्ण होणारी ती एकमेव आहे. वैशाली ने आपल्या जिद्दीवर आणि अथक परिश्रम करून हे यश संपादन केले आहे.

देशभरातून लाखोंच्या संख्येने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये वैशाली हीने ही कामगिरी केल्याने नवी मुंबईसह राज्याचे नाव उंचावले आहे. आई वडील आणि घरातल्यांच्या सहकार्याने आपण हे यश मिळविले असे वैशालीने सांगितले. निकाल समजल्यावर वैशाली आणि तिच्या घरातील सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते. या यशाने आपल्याला देशसेवा करण्याची संधी मिळणार असून आनंद आणि समाधान मिळत असल्याची भावना वैशालीने व्यक्त केली.

Related Posts
Translate »