महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image महाराष्ट्र लोकप्रिय बातम्या

जालना ते पुणे रेल्वेचा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते शुभारंभ

नेशन न्युज मराठी टीम.

जालना – जालना ते पुणे व किसान रेल्वेचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते जालना रेल्वे स्टेशन येथे रेल्वेस हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश राठोड, आमदार विक्रम काळे, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, भास्कर दानवे, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, रेल्वेचे एजीएम अरुण जैन, डीएमआर भुपेंद्र सिंग आदींची उपस्थिती होती.

केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, जालन्यासह मराठवाड्यातून पुणे शहराकडे प्रवास करणाऱ्यांची मोठी संख्या आहे. प्रवाश्यांना केवळ बस व ट्रॅव्हल्सवर अवलंबून राहावे लागत होते. वाढत्या रहदारीमुळे सहा ते सात तास पुण्यासाठी नागरिकांना लागत होते. पुण्यासाठी रेल्वे व्हावी, अशी नागरिकांची मागणी लक्षात घेता जालना ते थेट पुणे रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत असल्याचे सांगत जालन्यात पीट लाईन व्हावी, अशी मागणी असून तांत्रिक बाबी तपासून यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी सांगितले.

किसान रेल्वेच्या माध्यमातून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला कांदा आसाम राज्यात या रेल्वेच्या माध्यमातून पाठविण्यात आला आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचेही केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी यावेळी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांचीही समयोचित भाषणेही झाली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »