महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

बावीस वर्षीय युवतीची प्रेमसंबंधातून गळा दाबून हत्या

नेशन न्यूज मराठी टीम.

वर्धा / प्रतिनिधी – स्त्री पुरुष प्रेम संबंधाना अजूनही मोकळेपणाने समाज मान्यता कमी प्रमाणत दिसून येते. शैक्षणिक वाटचाल सुरु असताना प्रेम व आकर्षण यातील जागरूकता युवा पिढीला असणे देखील गरजेचे आहे. तसेच कुठल्याही कारणास्तव नकार’ पचवता येणे देखील आवश्यक आहे. कौटुंबिक, सामाजिक दबावापोटी युवक युवतींना अशा प्रसंगाला एकट्याने सामोरे जावे लागते. कुटुंबात मोकळेपणे संवाद कमी घडत असल्याने भीतीपोटी नाती लपवण्याशिवाय या प्रेमी युगुलांना पर्याय नसतो. आणि यातूनच कधी कुटुंब सदस्याकडून तर कधी प्रेमाच्या नात्यातूनच हत्त्या घडते. अशीच घटना वर्धा येथे घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील जयभीम वॉर्डमध्ये राहणाऱ्या युवतीची प्रेम प्रकरणातून हत्या केल्याची धक्कादायक घटना गावात घडली. भरदिवसा दुपारचा फायदा घेत युवकांनी युवतीच्या घरात शिरून वायरने गळा दाबुन हत्या केली.

वय वर्षे २२ असलेली युवती नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाला यवतमाळला शिक्षण घेत होती. यवतमाळ वरून ती गावात आली होती. दुपारच्या वेळी घरी कोणी नसताना आरोपी युवक, आरोपी हा घरात घुसला व तू माझ्याशी का बोलत नाहीस असा वाद घालीत तिचा गळा वायरने आवरून तिला मारून टाकले. स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व पोलीस निरीक्षक प्रफुल्ल डाहूले यांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली व चोवीस तासातच या प्रकरणाचा छडा लावला आहे.

आरोपीला धामणगाव येथून अटक करण्यात आली. व विविध कलमासह आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृतक युवतीचे व आरोपीचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते घरच्यांना ते माहीत झाले होते. त्यामुळे तिला गावात आणले गेले होते. आरोपीचे व युवतीचे बोलणे गेल्या काही दिवसापासून बंद झाले होते. आरोपीने तू माझ्याशी का बोलत नाही तिच्यावर संशय घेत तिचा गळा आवळून तिला मारून टाकले अशी माहिती पोलिसांनी दिली.

पुढील तपास अल्लीपूर ठाणेदार प्रफूल्ल डाहूले करीत आहेत. बावीस वर्षीय युवतीची प्रेमसंबंधातून हत्या गळा दाबून केल्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेले व युवतीची हत्या झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »