महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
इतर

सिंचन वाढविण्यासाठी जिल्ह्यातील नद्यांचे खोलीकरण व्हावे – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

अमरावती -जिल्ह्यातील चंद्रभागा, सापन, चारघड, पूर्णा, बिच्छन अशा विविध नद्यांच्या क्षेत्रात ठिकठिकाणी संरक्षण भिंत, पूल आदी उभारून सलग बंधारे निर्माण करण्यात यावेत, त्याचप्रमाणे, जल पुनर्भरण डोह निर्माण करण्यात यावेत, असे निर्देश जलसंपदा, कामगार, शिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.

राज्यमंत्री श्री. कडू यांनी आज अचलपूर, परतवाडा, शिरजगाव, करजगाव, चमक आदी विविध गावांना भेट देऊन तेथील नदी क्षेत्राची पाहणी केली. जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू यावेळी म्हणाले की, नद्यांच्या क्षेत्रात संरक्षक भिंतीसह सलग बंधारे व जलपुनर्भरण डोह उभारावेत. त्यामुळे संबंधित परिसरातील करजगाव, शिरजगाव या भागातील पाण्याची पातळीत वाढ होऊन सिंचन वाढेल. परिसरातील शेकडो शेतक-यांना फायदा होईल.
अचलपूर व परतवाडा या जुळ्या शहरातून जाणा-या बिच्छन नदीवर पूल उभारून सौंदर्यीकरण करण्यात यावे. त्यात पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन व सांडपाण्याचे निराकरण करण्याची तरतूद असावी. नदीच्या काठावर विविध वृक्षसंपदा, उद्याने निर्माण करुन सौंदर्यीकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

Related Posts
Translate »