महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी राजकीय

भाजप विरुद्ध भारताचे लोक अशी ही लढाई आहे-वर्षा गायकवाड

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – दक्षिण मध्य मुंबईची जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्याने वर्षा गायकवाड प्रचंड नाराज होत्या. मुंबई दक्षिण मध्यची जागा उद्धव ठाकरेंना दिल्याबद्दल त्यांनी ‘आक्षेप’ व्यक्त केला होता. अखेर वर्षा गायकवाड यांची प्रतीक्षा संपली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजी देखील कमी झाल्याचे दिसत आहे. कारण काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. आता कोणतीही नाराजी नसून आम्ही एकत्र आहोत, एक कुटुंब आहोत तसेच एकत्र मिळून काम करू असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला त्या म्हणाल्या “काँग्रेस पक्षाचे मी आभार व्यक्त करते कि त्यांनी पुन्हा एकदा मला संधी दिली आणि माझावर विश्वास टाकला. उद्धव ठाकरे यांचे सुद्धा आभार मानते. येणाऱ्या काळामध्ये वर्षाला आम्ही खासदार बनवून पाठवणार असे बोलुन त्यांनी मला अश्वस्वत केलं होतं. महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते विजयासाठी एकत्र पणे काम करतील. येणाऱ्या काळात शरद पवार यांची देखील भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेणार आहे.”

तसेच बीजेपीवर त्यांनी कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या “संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष असणार आहे. भाजप विरुद्ध भारताचे लोक अशी ही लढाई आहे. यावेळी जनतेलाच उतरावं लागेल मैदानामध्ये आणि आम्हाला खात्री आहे जनता सुज्ञ आहे.” ही लढाई आता लोकांनाच हातात घ्यावी लागणार आहे. जनता जशी सरकार बनवते तसेच जनता सरकार खाली देखील खेचू शकते हे यावेळी दिसेल. असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी नगरिकांना केले.

महायुतीकडून अजून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीकडून उत्तर मध्य मुंबईमधून उज्वल निकम आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मुंबईत ठाकरे गटाकडून मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्य मधून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर आणि मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दीना पाटलांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मुंबईमधून काँग्रेसनं आपला उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही.

Related Posts
Translate »