महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

देशात मोदींची लाट नाहीच,सुषमा अंधारे यांचे विरोधकांवर टिकास्त्र

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

अमरावती/प्रतिनिधी – संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दुमचक्री सुरू झाली आहे. सर्वच पक्ष मोठ्या ताकदीने सभा घेत जन समुदाय आपल्या कडे ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच महाविकासआघाडीचे उमेदवार असलेले बळवंत वानखेडे यांच्या प्रचार सभा घेण्यात आली. त्यात शिवसेनेच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर चांगलीच तोफ डागली, त्यांनी सांगितले की आता देशात मोदीची लाट नाहीच आहे. कारण अमरावतीत उन्हाची एवढी मोठी लाट असताना सामान्य उमेदवारासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा जनसमुदाय जमणे ही फार मोठी गोष्ट आहे. हुकूमशाहाच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठीची लाट आहे अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

एकीकडे कोल्हापूर संस्थानाला महाविकास आघाडीचे सगळे नेते जाऊन सन्मानाने त्यांना उमेदवारी देतात तर दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांना चार-चार दिवस दिल्ली येथे अमित शाह मोदी भेटत नाहीत. त्यांना ताटकळत राहावे लागते. एवढेच नव्हे तर नरेंद्र मोदी, अमित शाह हे देवेंद्र फडणवीस पण चार-चार दिवस ताटकळत ठेवतात. परंतु, एका तासाच्या आत ज्यांना उमेदवारी आधी जाहीर झाली नंतर त्याचा पक्ष प्रवेश झाला त्यांना मात्र एका तासात अमित शाह हे भेट देतात. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा नवनीत राणा यांची ताकद जास्त वाढतेय काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. सत्ता केंद्र अमरावती तर होत नाही? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

नवनीत राणा यांच्यावर माझ वैयक्तिक रोष नाही. परंतु, मला असं वाटतं ज्यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. एकीकडे बर्वे यांचे जात प्रमाणपत्र एका दिवसात रद्द होते आणि दुसरीकडे वर्षानुवर्षे नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित असूनही तथाकथित महाशक्तीने उमेदवारी दिली, हे निश्चितच कुठेतरी खेदजनक आहे. न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजूने लागणार जणू भाजपला हे कळून चुकले की काय? अशी शंका येत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली

Related Posts
Translate »