महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
राजकीय

महिला आरक्षण विधेयकाची आगामी लोकसभा निवडणुकीपासून अंमलबजावणी करावी- काँग्रेसची मागणी

नेशन न्यूज मराठी टीम.

जालना/प्रतिनिधी – बहुचर्चित महिला आरक्षण विधेयक केंद्र सरकारने मंजूर केले असून राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारला महिलांविषयी खरी सहानुभूती असेल तर त्यांनी या महिला आरक्षण विधेयकाची आगामी लोकसभा निवडणुकी पासून अंमलबजावणी करावी, अशी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा नंदा पवार यांनी वतीने मागणी केली आहे.

आज नंदा पवार यांनी जालन्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की,देशातील लोकसभा व विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या महिला आरक्षण विधेयकास मोदी सरकारने ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ असे नाव दिले आहे. राज्यसभेने मंजूर केलेले महिला आरक्षण विधेयक लोकसभेनेही मंजूर करावे, अशी काँग्रेस पक्ष गेल्या नऊ वर्षांपासून मागणी करत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खासदारांसह लोकसभेच्या नवीन वास्तूत प्रवेश केल्यानंतर त्यांनी पहिलं विधेयक मांडलं ते महिला आरक्षणाचे. हे विधेयक काँग्रेस पक्षानेच आणले आहे, मोदी सरकारने याचे श्रेय घेता कामा नये. काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्या श्रीमती सोनिया गांधी, राष्ट्रीय नेते राहूल गांधी यांनी हे महिला आरक्षण विधेयक मंजूर व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केला होता.

मोदी सरकारने २०२४ च्या निवडणुकीवर डोळा ठेवून हे विधेयक जाणीवपूर्वक आणले आहे. २०१४ पासून मोदी सत्तेत आहेत, मग या विधेयकासाठी इतकी वर्षे वाट का पाहिली, हा आमचा प्रश्न आहे. देशातील ५० टक्के जनतेला निर्णय प्रक्रियेच्या बाहेर ठेवणे हे योग्य नाही. भारताची प्रगती करायची असेल तर त्यांचा निर्णय प्रक्रियेत समावेश व्हायला हवा. हीच बाब सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ओळखली होती आणि म्हणूनच त्यांनी २०१० साली महिलांना आरक्षण देणारे विधेयक आणले होते. ते राज्यसभेत मंजूरही झाले होते. भाजपा वा मोदी सरकार या महिला आरक्षण विधेयकाबाबत गंभीर असेल तर त्यांनी या विधेयकाची आगामी लोकसभा निवडणुकीपासून अंमलबजावणी करावी, अशी महिला काँग्रेसची मागणी असल्याची नंदा पवार यांनी सांगीतले.


Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »